Tuesday 28 November 2017

शुक्लपक्ष भृगुवासर, रात्रौ आषाढीची नवमी ।


आज आषाढ शुध्द नवमी ! स्वामीजींच्या जीवनातला हा अत्यंत महत्त्वाचा दिवस..! याच दिवशी स्वामीजींना मृत्यूचे दर्शन झाले.. या घटनेचा उल्लेख स्वामीजींनी आपल्या "अमृतधारा" या काव्यात केला आहे..

शुक्लपक्ष भृगुवासर, रात्रौ आषाढीची नवमी ।
अठराशे छप्पन्न शकाब्दी, मृत्यू पावलो आम्ही ।।


चार - दोन दिवस असाच आजारी पडलो.. जरा बरे वाटल्यावर चार - दोन फर्लांग हिंडून आलो.. परतताना थकवा वाटू लागला.. त्यांतच चढण चढून घरी आल्याने दमून , घरी अंथरुण घालून स्वस्थ पडून राहिलो.. थकल्यासारखे वाटत आहे हे कोणाजवळच बोललो नाही, पण मनात मात्र घाबरलो होतो..

सोहम् भजन चालू होते.. काही वेळाने डोळ्यांपुढे अंधारी आली व मनात एक विचार अत्यंत जोराने बळावला, तो असा - " माझे देहावसान आता समीप आले आहे, माझी हृदयक्रिया आता बंद पडणार..!"

हा विचार बळावतांच मागील सर्व गोष्टी विजेसारख्या डोळ्यांपुढे येउन गेल्या, व देहाचीच आसक्ती सोडण्याचा प्रसंग समीप येउन ठेपल्यामुळे मेंदूला (ज्ञानतंतूंना) एकाएकी जबर आघात बसला.. डोळ्यांपुढे मृत्यूचे विराट दर्शन होताच, एका झटक्यासरशी कामक्रोधादि विकारांचा चक्काचूर उडाला, आणी अंतःकरण भयाने व्यापले गेले..

भयातून भक्तीचा - (पूर्ण शरणागतीचा) उदय झाला.. आणी भक्तीने चिरशांति प्राप्त झाली..!"

लेखन संदर्भ : पावसचा प्रेमदिप - स्वामी सत्यादेवानंद

ॐ श्री गुरुदेव दत्त...







आत्मतत्त्व स्वरूपम्  |  शंकरानंद सद्गुरुम्  |
अज्ञान तम नाशाय |  वन्दे सर्वात्मकं गुरुंम्  ||
गुरुपौर्णिमा हा गुरू-शिष्य दोघांचाही आनंदसोहळा आहे..  गुरूचा शिष्याबद्दल आत्मविश्‍वास नि शिष्याची गुरूविषयी कृतज्ञता दोन्हीही या प्रसंगी व्यक्त होतात.. एका अर्थानं तो समसमा संयोग असतो.. वसंत ऋतूत आम्रवृक्षावर कोकिळानं पंचम सुरात आर्त गीत गावं, तसा हा योग असतो गुरुपौर्णिमा..!

गुरुतत्त्व आपल्याला खुपदा बोधात्मक अबोलपणे सुचवत असते.. कर्तव्यापुरते रहा हो आसक्त | अंतरी विरक्त रहा हो तुम्ही ||.. यावेळी आपण सद्गुरूला प्रार्थना करायची..
जे टाळणे अशक्य.. दे शक्ती ते सहाया..
जे शक्य साध्य आहे.. निर्धार दे कराया..
मज काय शक्य आहे.. आहे अशक्य काय..
माझे मला कळाया.. दे बुद्धी स्वामीराया..
तू बुद्धी दे.. तू तेज दे.. नवचेतना विश्वास दे..
जे सत्य शांत सर्वथा.. आजन्म त्याचा ध्यास दे..



आत्मतत्त्व स्वरूपम्  |  शंकरानंद सद्गुरुम्  |
अज्ञान तम नाशाय |  वन्दे सर्वात्मकं गुरुंम्  ||
गुरुपौर्णिमा हा गुरू-शिष्य दोघांचाही आनंदसोहळा आहे..  गुरूचा शिष्याबद्दल आत्मविश्‍वास नि शिष्याची गुरूविषयी कृतज्ञता दोन्हीही या प्रसंगी व्यक्त होतात.. एका अर्थानं तो समसमा संयोग असतो.. वसंत ऋतूत आम्रवृक्षावर कोकिळानं पंचम सुरात आर्त गीत गावं, तसा हा योग असतो गुरुपौर्णिमा..!
एका अर्थाने गुरुपौर्णिमा उत्सवाचा उद्देश आहे मागे वळून बघणे.. गुरु अनुग्रह म्हणजे सुंदरम् असा अनुपम योग.. अंतर्ध्यानाकडील प्रवासाचे ते पहिले पाऊल.. अंतरंग सुंदर होण्याचा तो प्रारंभ बिंदू.. या सुंदरम क्षणाच्या स्मृतिचे चिंतन-मनन-निधिध्यास आणि ध्यानात परिवर्तन..
अन् प्रारंभ करायचा स्वताःतल्या सुंदराचा शोध घ्यायला.. अंतरंग उजळनाऱ्या प्रकाश ज्योतीचा शोध घ्यायला.. तिमिरातून तेजाकडे जाताना हवी असते साथ एका ज्योतीची.. भरकटलेल्या ध्येयाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी गरज असते गुरुतत्व उजळनीची..!
गुरु म्हणजे ज्ञानाचा मधुर सागर आहे.. जलाशयात पाणी विपुल आहे.. परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही.. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही..!
॥ सद्गुरू तं सततं नमामि ॥  सर्व कर्म सद्गुरूचरणी अर्पण करता आले पाहिजेत, तरच साधना निरपेक्ष होते..!!

सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही.. पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी समाधानी होतो.. अशी दृष्टी साधकाला गुरु साधनेने प्राप्त होत असते..



गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे.. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय.. म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही.. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही..
जसजसे आपण निशंक होऊ तसतसे माझ्या कल्पनेप्रमाणे सद्गुरू आपल्याला पात्रतेपेक्षा भरभरून देईल हे निसंशय सत्य आहे....
साधकाने सद्गुरू कृपेच्या गुरुप्रेमाच्या प्रवाहात एखाद्या वाळक्या पानाप्रमाणे पडावं आणि तो गुरु प्रवाह जसा जसा पुढे जाईल तसं तसं त्याच्या बरोबर नि:शंकपणे जात रहावं.... या अपरोक्ष-प्रत्यक्ष... आत्मज्ञान व्हायच्या अगोदर होणार्‍या... परोक्ष-अप्रत्यक्ष ज्ञानाचा अधिकार काय सांगावा..!!.. हाच तो अनुभव-अनुभूती-दृष्टांत या द्वारे होणारा गुरुबोधरूपी ज्ञानयोग”.... वाचन-श्रवण-मौन-मनन-चिंतन.... याच्या अंगाने होणारा.... आणि निदीध्यासात रमणारा हाच तो.... आत्मस्वरूपी परमात्मा..

 चित्त स्मरणी गुरुदेव पाही I गुरु माझ्या जवळी राही II
जाणावी साधना हीच खरी I नेई आपणा मोक्ष घरी II

  ॥ सद्गुरू तं सततं नमामि ॥ सर्व कर्म सद्गुरूचरणी अर्पण करता आले पाहिजेत, म्हणजे उपासना निरपेक्ष होते !!

जयजय शंकरानंदा अवधूता I अवधूत चिंतनी सिध्दांता II
त्रैलोक्य पावना त्रिदोष दहना I त्रिगुणातीता निरंजना II














मुळांची वाढ आणि ज्ञानगर्भ... 

संपर्काच्या अभावात अन संपर्काच्या अडचणीमुळे... अविश्वासाच्या भिंती उभ्या राहतात... अन मग बाळसे धरु लागलेल्या रोपट्याची वाढ का होत नाही... हे समजत नाही... केवळ जमीन आहे म्हणुन ते वाढेल हा माणसाचा आशावाद झाला... पण मातीला नेमके काय हवे आहे?.. 

हे रोपाने अंर्तमुख होवुन नको का बघायला... मातीवर विश्वासा हा हवाच... माती नेहमीच प्रेमाने त्याचा सांभाळ या निश्चयावर असते... मुळांनी काही प्राप्त करून घेण्यासाठी खोल जायलाच पाहिजे... पण रोप जितके मातीच्या आतल्या प्रेमावर अवलंबुन आहे तसेच आणखी कितीतरी गोष्टीवर... 

माती आणि रोपे यातही वेगवेगळे विविधतेचे फरक... काही रोप ताठरत राहतात... पण बाहेरचे रोप ताठ ठेवायचे असेल तर... मुळांना पसरणे गरजेचे असते... रोपाची उगाच मी आहे तसाच असेन... अन काहिच न करता वाढावे अशी अपेक्षा चुकिची असते...  रुजण्याची ओढ हवी... मातीत गाडुन घेता यायला हवे... एका थेंबासाठी जमीन पोखरावी यावी लागते... हीच खरी ज्ञानाची ओढ... 

म्हणतात ना एक क्षण भाळण्याचा, बाकी सारे सांभाळण्याचा... मातीत मायेचा ओलावा असतोच मातीची रचना आकार देण्यासाठी असते, मायेचा ओलावा देत घडवणे घट्ट आधार देणे हा तीचा धर्म... तिच्यात रूजणार्या बीजाने ठरवले पाहिजे, किती खोलवर रूजायचे मातीला किती घट्ट धरून ठेवायचे... मुळे जितकी खोलवर जातील तितके झाड भक्कम... हेच मूळ ज्ञानगर्भाचे सत्य... ॐ श्री गुरुदेव दत्त...