Tuesday 28 May 2013

स्वातंत्र्यवीर सावरकर.... अनादी मी अनंत मी....

इतिहासात सावरकरांचे स्थान अढळ आणि अद्वितीय आहे….. स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहास घडविणारे इतिहासकार होते….. यांचे तेजस्वी व्यक्तीमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे….. दिक्कालाला भेदून भविष्याचा वेध घेणारा प्रतिभासंपन्न महाकवी.... आशयसंपन्न निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, रक्ताच्या शाईत बुडवून विद्युलतेच्या लेखणीने लिहीणारा व उज्ज्वल भूतकाल व श्रेष्ठ परंपरांचे ज्ञान घेऊन राष्टभक्तीचा स्फुल्लींग चेतविणारा ग्रंथकार.... अतीत कालातील घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखविणारा द्रष्टा इतिहासकार.... भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.... जी सावरकरांची प्रतिभा अग्निकण उधळते तीच काव्यपुष्पेही उधळते.... बघा, सावरकरांचे भावोत्कट साहित्य प्रत्यक्ष अनुभूतीतून साकारलेले आहे.... सावरकरांनी ज्या ज्या वेळी कृतीसाठी पाऊल टाकले, त्यांच्या बंडखोर मनात ज्या संवेदना उमटल्या, त्यांच्या कविमनाचे जे जे सौंदर्यग्रहण केले, त्या सर्व गोष्टी त्यांच्या साहित्यातून जगापुढे मांडल्या.....

बघा, कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी.... शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.... निबंधकार सावरकर हे तर्ककठोर, घणाघाती, अभ्यासपूर्ण, पल्लेदार शैलीमुळे अजरामर आहेत.... सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.... विषयाचा व्यासंग, स्वतंत्र दृष्टीकोन, विश्लेषक बुद्धी, डोळस स्वाभिमान आणि वस्तुनिष्ठ, साधार व स्फूर्तीदायक विवेचन ही त्यांच्या इतिहास ग्रंथांची वैशिष्ट्ये....

बघा, समाजसुधारक सावरकर हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखाचा विषय आहे..... त्यांचे सामाजिक कार्य देखील त्यांच्या देशभक्तिइतकेच प्रखर होते....

बघा, सावरकरांच्या देशभक्तीमध्ये अध्यात्मदर्शन देखील होते..... आपल्याकडे संगीत, कला, अध्यात्म इ. साधना करणार्‍या साधकांमध्ये गुरु-शिष्य परंपरा व अनुग्रह हा मोठा ठेवा आहे..... तशीच परंपरा राष्ट्र उभारणार्‍या क्रांतीकारकांच्या कार्यांत सुद्धा आहे..... दधिची ऋषींच्या अस्थींपासून वज्र बनवल्यानंतर आता काय करावे या विचारांत विधाता गुंतला असता, त्याला एक सुंदर स्वप्न पडले..... त्या स्वप्नाचे नाव होते, विनायक दामोदर सावरकर.....

बघा, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सामाजिक न्याय व रास्त अनुशासन पुन्हा प्रस्थापित करता यावे यासाठीच गांडीव धनु्ष्यपुन्हा हाती घ्यावयास उद्युक्त केले.... म्हणून काय कोणी अर्जुनास वा कृष्णास हिंसक म्हणू शकेल काय..?.. सुयोग्य कारणासाठी सशस्त्र प्रतिकार करणे हे अध्यात्माशी पूर्णतः सुसंगत आहे.... किंबहुना गीतातत्वाचा मूलाधार आहे, हाच भारतीय दृष्टीकोन आहे.... तोच दृष्टीकोन सावरकरांचा होता.... बघा, योगीजन योगाभ्यास करताना शरीराची नाडी व श्वास यांच्यावर ताबा मिळविण्यासाठी चिंतनशील असतात.... पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी युरोपमध्ये अभ्यास करू  इच्छिणार्‍यांसाठी काही शिष्यवृत्त्या जाहीर केल्या होत्या..... त्यासाठी अर्ज सादर करताना सावरकर लिहीतात, "स्वावलंबन आणि स्वातंत्र्य म्हणजे देशाची नाडीआणि श्वासआहेत, असे मी मानतो..... अशी सावरकरांची देशभक्ती व अध्यात्मिक विचारधारा होती.....

बघा, लंडनमधील सर्व आघात सावरकरांनी अत्यंत संयमाने व योग्याच्या स्थितप्रज्ञ वृत्तीने सहन केले..... सावरकरांना विवेकानंदांविषयी जागतिक स्तरावरील बुद्धिमान पुरुषम्हणून मनस्वी आदर होता.... वेदांतील विचार व विवेकानंदांचे विचार एकच होत, हे विवेकानंदांच्या कार्यामधून त्यांना जाणवले होते.... विवेकानंद आपल्या देशबांधवांना उद्देशून म्हणत, "तुमचे स्नायू, तुमचे बाहू अधिक बलवान झाले की तुम्हास भगवत्‌ गीताअधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.... अलौकिक बुद्धिमत्ता असलेला तसाच अचाट शक्तिसंपन्न कृष्ण कसा होता, तेही तुमच्या सळसळत्या रक्ताला उमगेल.... उपनिषदांचा अर्थही नीटपणे समजेल आणि आत्मन्चे दिव्यत्व सुद्धा उमगू शकेल..... हीच मध्यवर्ती कल्पना सावरकरांच्या स्वतंत्रतेचे स्तोत्रया कवितेमध्ये आहे.....
मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती, योगीजन परब्रह्म वदती ॥
योगीजन सुद्धा स्वातंत्र्यदेवतेस परब्रह्म म्हणून संबोधतात, आणि आपला आदर व्यक्त करतात.... देशाकडे मातृभूमी म्हणून पाहण्याची अध्यात्मिक संकल्पना फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे..... वेदांमधील पृथ्वीसूक्तापासून बंकीमचंद्रांच्या वंदेमातरम्पर्यंत ही प्रथा अंमलात आणली गेली आहे..... अथर्ववेदात याचे सुरेख वर्णन आहे....
वेदांचे जाणकार सावरकर हे पण या देशभक्तिच्या आध्यात्मिक अंगाचे चांगले ज्ञान होते.... म्हणूनच कालिदासाशी स्पर्धा करणारे उपमा कौशल्य, मोगलांचे सिंहासन फोडणार्‍या मराठी भाल्यांचे लखलखीत तेज आणि संतकवींचे भावमाधुर्य हे गुण सावरकरांच्या कवितेत असतात....

बघा, इ. स. १९२८ मध्ये रत्नागिरीतल्या अखिल-हिंदू गणेशोत्सवात वीर सावरकरांचे कुंडलिनीया विषयावर भाषण झाले होते.... तेव्हा ते म्हणाले होते, की बंदिवासात असताना एकांतातली करमणूक म्हणून मी कुंडलिनीच्या जागृतीचा आनंद अनुभवला आहे.... म्हणूनच सावरकर हे त्या अंदमानच्या यमपुरीतल्या सर्व हाल अपेष्टा सहन कअरून तिथे मृत्युवरही मात करू शकले.... ते ह्या सोहंम् व ध्यानयोग यांच्या नियमित अभ्यासामुळेच.... बंदीगृहात दिवसभर सक्तमजुरीची कामं करून कोठडीत कोंडलं गेल्यावर, सावरकर हा ध्यानाभ्यास करीत.... स्वामी विवेकानंदांचा राजयोगहा ग्रंथ ते उघडीत, त्यातल्या स्वामींच्या चित्राला नमस्कार करीत आणि नासिकाग्रावर दृष्टी रोखून ध्यान सुरू करीत.... सप्तर्षीह्या आर्या वृत्तांतल्या कवितेत त्यांनी म्हटलयं....
योगीराजाचा त्या ग्रंथ श्री राजयोगमी उघडी
शांत रसाचा पेला दूर करावा गमेचि जो न घडी ॥
बघा, सावरकर सांगत जो जो योग साधना करील त्या प्रत्येकाला जगातल्या कुठल्याही धर्माच्या अनुययाला - अर्थात साधना करील त्याला योगानंद लाभणे शक्य आहे.... कुंडलिनी ही मानव मात्रात असते, योगशास्त्र ही हिंदुराष्ट्राची जगाला मोठी देणगी आहे... म्हणूनच सावरकरांनी हिंदू ध्वजावर कुंडलिनी अंकित केली आहे... सावरकरांना योगाविषयी विचारलं तर ते उत्तर देत, की हा सर्वांशीच चर्चेचा विषय नाही, स्वतः करून अनुभव घेण्याचं हे शास्त्र आहे.... हा अनुभव रोज ते स्नानानंतर अर्धा तास करीत असत.... ह्या योगा अभ्यासाच्या बळावरच ते पूर्वी मृत्युला मृत्यो, येतोस तर ये कोण भितोय तुला हे आपल्या काव्यात अजरामर करून ठेवले आहे....
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला ।
मारिल रिपू असा जगती कवण जन्मला ।
त्यांच्या समग्र जीवनातील प्रत्येक घटना असामान्य अलौकिक व रोमांचक होती, त्यांनी जगावं कसं तसेच समाधानानं मरावं कसं हे शिकवलं....

ॐ श्री गुरुदेव दत्त....


No comments:

Post a Comment