Wednesday 30 December 2015

नवीन वर्ष आणि आपले संकल्प... 

नवीन वर्ष म्हंटले कि संकल्पांचा पाउस, पण “संकल्प” या मानसिकतेपलीकडे जावून नवीन वर्ष सफल बनवण्यासाठी काही तरी वेगळे करण्याची वेळ आली आहे... प्रत्येकाला वाटते कि काही तरी ग्रेट मिळावं किंवा काही तरी ग्रेट घडावं.. पण तसे योग्य प्रयत्न मात्र होत नाहीत कारण आपण गडबडतो ते ध्येय ठरविण्यात आणि ते कसे साध्य करायचे याचा योग्य आराखडा नसलेमुळे... यासाठीच पाहिजे आपल्या ध्येयाचा अभ्यास आणि ध्येयापर्यंत पोचण्यासाठी जागरूकता आणि सातत्य...

तुमचा मोबाईल जेंव्हा स्लो चालतो किंवा काही गडबड असते तेंव्हा तुम्ही काय करता..?.. क्लीनअप किंवा रिसेट, अपग्रेड.. कारण त्याशिवाय मोबाईल चांगला चालू शकत नाही... अगदी त्याच पद्धतीने आपले आहे... मागील वर्षातील अपयशाचा आणि अपेक्षाभंगाचा भावनिक गोंधळ तसाच ठेऊन सर्वोत्तम कामगिरी होणे शक्य नाही... त्याकरिता आपल्याला हे दुःखं लोटूनच नव्या उमदेनी उत्कृष्ठ कामाने सफलतेचा शिखर सर करायचाय... काही अपयशी गोष्टींचा पूर्ण जागरूकतेने अभ्यास करा आणि पाठीवर अयोग्य विचारांचे ओझे घेवून पळणे सोपे कि न घेवून पळणे सोपे.. यावर नक्कीच विचार करा...

मन आणि विचार जितके अस्थिर राहतील... तितके आपले मन..विचार आणि कल्पनाशक्ती व्यापलेली राहते व तिचा उपयोग होत नाही... म्हणजेच आपण नवीन, वेगळे, अप्रतिम आणि अतुल्य काही करू शकत नाही... मनाला मशगुल ठेवणारा अयोग्य विचार नक्कीच आपल्या सफलतेचे प्रमाण कमी करतो... मग आपण एका धेयाकडून दुसऱ्या ध्येयाकडे वळतो... प्रत्येक कामात धरसोडवृत्ती, कोणतेच काम यामुळे पूर्ण होत नाही, कारण आपण कामाप्रती अभ्यासू, जागरूक आणि एकनिष्ठ प्रामाणिक नसतो... 

मित्रांनो.. परत एकदा वेगळ्या पद्धतीने सुचवतोय... कालच्या मानसिक आणि भावनिक गोंधळाला घेवून जर तुम्ही प्रत्येक नवीन दिवसाची किंवा वर्षाची सुरवात कराल... तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला काल मिळाले होते... मग रोज दरवर्षी तेच ते हवे आहे का..?.. नाही ना..?.. मग अयोग्य सवयी आणि असंग सोडाच आणि आपल्याला सर्वोत्तम अभ्यास कामात व्यस्त ठेवा... मग भले ते तात्पुरते आपणास फायद्याचे न जाणवो पण दीर्घकाळासाठी योग्य असेल... भविष्य योग्य पाहिजे तर आजचे प्रयत्न देखील योग्यच पाहिजेत, तात्पुरत्या फायदेशीर गोष्टी आपणास दीर्घकालीन फायद्यापासून दूर नेतात, म्हणजेच आज क्षणिक सुखासीन ठरणाऱ्या गोष्टी खरेतर आपल्या दीर्घकालीन सुखातील अडथळेच.!.. यासाठी आपणाकडे योग्य-अयोग्य याची पारख आणि विवेक हवाच... याचबरोबर समाधान आणि सफलतेसाठी आपल्याला ध्येयाप्रती नियमितपणे प्रयत्न आणि परिश्रम हवेतच...

मोबाईलच्या स्क्रीनला ओरखडा पडू नये म्हणून स्क्रीनगार्ड लावणारे आपण... आपल्या विविध अयोग्य सवयीं, अहंकारी धारणांमुळे निर्माण होणाऱ्या Attitudeने आपण सदैव इतरांना ओरखडतो, पण खरेतर आपण स्वतःलाच दुखावत असतो, कुढत असतो किवा शरीराला त्रास देत असतो... ज्या ठिकाणी मनाचे, भावनांचे आणि शरीराचे असंतुलन होते तिथे तिढा आणि अपयश वाढतच जाते... म्हणून आपल्याला आपल्या अवतीभवती असलेल्या अयोग्य नकारात्मक उर्जेचा बाय-बाय करावाच लागणार आहे... मोबाईल स्क्रीनची काळजी, तशी स्वतःची देखील घ्या म्हणजे सुष्पष्टता वाढेल आणि सोबत मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंपन्नता देखील... मन विचार आणि शरीर शक्य तितके स्क्रॅचप्रुफ ठेवा... जीवनाच्या सोबतच दर दिवसाचा आनंद आणि गोडवा वाढत जाईल... 







आयुष्यातील सवयी आणि संकल्प...  

नवीन दिवस असो किंवा नवीन वर्ष, निसर्ग सर्वांना एकसारखीच सुरवात देतो, पण तरीही प्रत्येकाच्या दिवसाचा आणि वर्षाचा एण्ड वेग-वेगळा का..?.. काही यशस्वी होतात तर काही नाही असे का..?.. मित्रांनो चांगली सुरवात करणे म्हणजेच अर्धे काम फत्ते झाल्यासारखेच असते… ज्या पद्धतीने आपली सुरवात होत असते त्यावरच त्या दिवसाचा, वर्षाचा किंवा कामाचा एण्ड अवलंबुन असतो…

नवीन वर्ष आले की संकल्पांचा पाउस, पण आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आणि योग्य दिशेने आगेकूच करण्यासाठी गरज आहे ती प्रभावी चॉइसेसची, ज्या फक्त चॉइसेसच नसून जगभरातील सफल लोकांच्या तीन सर्वोत्तम सवयी देखील आहेत… ज्या आपल्यालाही त्यांच्याप्रमाणे सफलता, समाधान, सन्तलुन, साहस आणि आत्मविश्वास देतील… सफल लोकांप्रमाणे सफलतेसाठी आपल्यालाही आपल्या दृष्टिकोनात आणि चॉइसेसमधे बदल करणे अनिवार्य आहे… कारण बदल, विकास आणि यश हे केवळ आपल्या निवडींवरच अवलंबुन असते… 

अ) योग्य पारख करणे (Appreciation ) : यशापयश हे केवळ आपण केलेल्या चॉइसेस वरुन ठरते म्हणूनच आपल्याला पारखी बनणे गरजेचे आहे... खरा पारखी व्यक्ती तोच असतो जो स्वत:ला पूर्णपणे ओळखतो आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे व्यक्ती, वस्तू, निर्णय, गुंतवणूक व इतर बाबींमधे योग्य निवडी आपण तेंव्हाच करू शकतो जेंव्हा स्वत:ला स्वत:च्या विचारांची, ज्ञानाचि, वैशिष्ट्यांची व अनुभवांची पूर्ण पारख असते... पारखी बना व काम, दिवस आणि वर्ष यशस्वी बनवा... 

ब) स्वीकृती करणे / मान्य करणे (Acceptance) : आपण विकासाकडे तेंव्हाच वळतो जेंव्हा एखादे ध्येय मान्य करतो... यानंतर आपल्या उणीवा, चूका व नकारात्मक गुणांची स्वीकृती केल्यावरच वयक्तिक तसेच व्यावहारिक बदल, सुधार आणि विकास शक्य आहे... 

  1. स्वीकार करा योग्य बदलांचा, विचारांचा व आचरणांचा...
  2. खरं जीवन असो किंवा फेसबुक स्वीकार करा मर्यादा, शिस्त, नियम, आदर व जवाबदार्या पाळण्याचा...
  3. स्वीकार करा सतत शिकण्याचा, विचारी, वास्तविक आणि संतुलित बनण्याचा... स्वीकार करा प्रोत्साहन व पाठिंबा देण्याचा आणि योग्य गुंतवणुकीचा... 
  4. स्वीकार करा शब्द पाळण्याचा, वचनबद्ध राहण्याचा, दुसऱ्याचे मन, मान, सन्मान आणि आदरभाव जपण्याचा तरच आपणास योग्य ते सर्व मिळेल... 
  5. घर, समाज, देश असो किंवा पर्यावरण प्रत्येकाच्या छोट्यातल्या-छोट्या योगदानानेच मोठ्यातले-मोठे बदल घडत असतात म्हणून स्वीकार करा जागरूक, सतर्क व कर्तव्यदक्ष राहण्याचा, निस्वार्थ सेवा करण्याचा, निसर्ग जपण्याचा आणि स्वभावात सौम्यता ठेवण्याचा...
क) प्रतिकार करणे (Resistance) : मित्रांनो, प्रतिकार करणे म्हणजे कोणाच्या विरूद्धात जाणे नसून नकारात्मक बाबींनपासून स्वत:ला थांबवणे व त्यापासून दूर राहणे... काही इइच्छा वा व्यसने तुम्हाला गुलाम करतील... भ्रष्ट्र आचार तुम्हाला कमजोर करील तर आळस तुम्हाला पराक्रमशून्य बनवेल मग असे असतांना आपले काम, दिवस किंवा वर्ष यशस्वी होईल कसे..?.. यासाठीच समृद्ध, सन्मानयुक्त आणि समाधानकारक प्रतिकार गरजेचा आहे... प्रतिकार करणे म्हणजे स्वता:ला खालील बाबींपासून दूर ठेवणे...

१) प्रतिकार करा नकारात्मक विचारांचा, वाइट सांगतीचा, वेळेच्या अपव्ययाचा व अयोग्य लोकांचा... 

२) प्रतिकार करा अज्ञानाचा, अवास्तविकतेचा, असंतुलित आहाराचा व वागण्याचा... काम नसतांही अयोग्यात बिझी राहण्याचा, राग व अहंकाराचा...

३) प्रतिकार करा सुविधांचा दूरउपयोग करण्याचा, टाळाटाळ करण्याचा, कारणे देण्याचा व इतरांना दुखावणार्या कृत्यांचा प्रतिकार करा...

४) प्रतिकार करा शॉर्टकट मारण्याचा, इतरांचे श्रेय लाटण्याचा, इतरांवर अन्याय करण्याचा... व्यसन, व्यंग व वायफळ गोष्टी करण्याचा...

मित्रांनो, आयुष्यात सर्व काही आपल्या चॉइसेसवर निर्भर आहे आणि म्हणूनच वरील तीन चॉइसेस निरंतर लक्षात ठेवा... कारण “अमल करो तो बनती है जिंदगी जन्नत भी, जहन्नुम भी”... मग करा तर एक दमदार सुरवात नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने, दर दिवशी आणि दरवर्षी... शेवटी परत एकदा सांगतो मित्रांनो, शेवट चांगला असो किंवा वाईट, सुखद असो किंवा दु:खद फरक असतो तो फक्त योग्य चॉइसेसचा...