Wednesday 30 December 2015

नवीन वर्ष आणि आपले संकल्प... 

नवीन वर्ष म्हंटले कि संकल्पांचा पाउस, पण “संकल्प” या मानसिकतेपलीकडे जावून नवीन वर्ष सफल बनवण्यासाठी काही तरी वेगळे करण्याची वेळ आली आहे... प्रत्येकाला वाटते कि काही तरी ग्रेट मिळावं किंवा काही तरी ग्रेट घडावं.. पण तसे योग्य प्रयत्न मात्र होत नाहीत कारण आपण गडबडतो ते ध्येय ठरविण्यात आणि ते कसे साध्य करायचे याचा योग्य आराखडा नसलेमुळे... यासाठीच पाहिजे आपल्या ध्येयाचा अभ्यास आणि ध्येयापर्यंत पोचण्यासाठी जागरूकता आणि सातत्य...

तुमचा मोबाईल जेंव्हा स्लो चालतो किंवा काही गडबड असते तेंव्हा तुम्ही काय करता..?.. क्लीनअप किंवा रिसेट, अपग्रेड.. कारण त्याशिवाय मोबाईल चांगला चालू शकत नाही... अगदी त्याच पद्धतीने आपले आहे... मागील वर्षातील अपयशाचा आणि अपेक्षाभंगाचा भावनिक गोंधळ तसाच ठेऊन सर्वोत्तम कामगिरी होणे शक्य नाही... त्याकरिता आपल्याला हे दुःखं लोटूनच नव्या उमदेनी उत्कृष्ठ कामाने सफलतेचा शिखर सर करायचाय... काही अपयशी गोष्टींचा पूर्ण जागरूकतेने अभ्यास करा आणि पाठीवर अयोग्य विचारांचे ओझे घेवून पळणे सोपे कि न घेवून पळणे सोपे.. यावर नक्कीच विचार करा...

मन आणि विचार जितके अस्थिर राहतील... तितके आपले मन..विचार आणि कल्पनाशक्ती व्यापलेली राहते व तिचा उपयोग होत नाही... म्हणजेच आपण नवीन, वेगळे, अप्रतिम आणि अतुल्य काही करू शकत नाही... मनाला मशगुल ठेवणारा अयोग्य विचार नक्कीच आपल्या सफलतेचे प्रमाण कमी करतो... मग आपण एका धेयाकडून दुसऱ्या ध्येयाकडे वळतो... प्रत्येक कामात धरसोडवृत्ती, कोणतेच काम यामुळे पूर्ण होत नाही, कारण आपण कामाप्रती अभ्यासू, जागरूक आणि एकनिष्ठ प्रामाणिक नसतो... 

मित्रांनो.. परत एकदा वेगळ्या पद्धतीने सुचवतोय... कालच्या मानसिक आणि भावनिक गोंधळाला घेवून जर तुम्ही प्रत्येक नवीन दिवसाची किंवा वर्षाची सुरवात कराल... तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला काल मिळाले होते... मग रोज दरवर्षी तेच ते हवे आहे का..?.. नाही ना..?.. मग अयोग्य सवयी आणि असंग सोडाच आणि आपल्याला सर्वोत्तम अभ्यास कामात व्यस्त ठेवा... मग भले ते तात्पुरते आपणास फायद्याचे न जाणवो पण दीर्घकाळासाठी योग्य असेल... भविष्य योग्य पाहिजे तर आजचे प्रयत्न देखील योग्यच पाहिजेत, तात्पुरत्या फायदेशीर गोष्टी आपणास दीर्घकालीन फायद्यापासून दूर नेतात, म्हणजेच आज क्षणिक सुखासीन ठरणाऱ्या गोष्टी खरेतर आपल्या दीर्घकालीन सुखातील अडथळेच.!.. यासाठी आपणाकडे योग्य-अयोग्य याची पारख आणि विवेक हवाच... याचबरोबर समाधान आणि सफलतेसाठी आपल्याला ध्येयाप्रती नियमितपणे प्रयत्न आणि परिश्रम हवेतच...

मोबाईलच्या स्क्रीनला ओरखडा पडू नये म्हणून स्क्रीनगार्ड लावणारे आपण... आपल्या विविध अयोग्य सवयीं, अहंकारी धारणांमुळे निर्माण होणाऱ्या Attitudeने आपण सदैव इतरांना ओरखडतो, पण खरेतर आपण स्वतःलाच दुखावत असतो, कुढत असतो किवा शरीराला त्रास देत असतो... ज्या ठिकाणी मनाचे, भावनांचे आणि शरीराचे असंतुलन होते तिथे तिढा आणि अपयश वाढतच जाते... म्हणून आपल्याला आपल्या अवतीभवती असलेल्या अयोग्य नकारात्मक उर्जेचा बाय-बाय करावाच लागणार आहे... मोबाईल स्क्रीनची काळजी, तशी स्वतःची देखील घ्या म्हणजे सुष्पष्टता वाढेल आणि सोबत मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंपन्नता देखील... मन विचार आणि शरीर शक्य तितके स्क्रॅचप्रुफ ठेवा... जीवनाच्या सोबतच दर दिवसाचा आनंद आणि गोडवा वाढत जाईल... 

No comments:

Post a Comment