Sunday 16 March 2014


WISH ALL OF YOU A HAPPY & SAFE HOLI ..... 

Our happiness depends on the habit of mind we cultivate..... So practice happy thinking every day..... Cultivate the merry heart, develop the happiness habit, and life will become a continual feast.....also know that The dominant idea behind Holi festival is that we should live more in harmony with nature instead of trying to destroy her and make her our slave.... Enjoy nature friendly Holi With happiness..... Happy Holi..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....



होळी महात्म – होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन......

होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे..... ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे काही आख्यायिका आहेत...

लहान मुलांना पीडा देणार्‍या होलिका, ढुंढा, पुतना ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात.......

एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता...... होलिकेला वर होता की तिला अग्नि जाळू शकणार नाही..... परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले..... तसेच मदनदहना च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात......

हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे..... हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा.... त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी......

आजच्या लोकोत्सवात होळी, धूळवड आणि रंगपंचमी हे तीन मुख्य प्रकार दिसतात..... जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून..... त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने "शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.......

वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना.... होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी..... हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे..... या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा... जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल......

अशी हि होळी सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो ..... सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा .....

ॐ श्री गुरुदेव दत्त....

Saturday 8 March 2014


संवर्धिनी...   आदिशक्ती...      

स्त्री चे प्रत्येक नाते आजी, आई, बहिण, मैत्रीण, बायको, मुलगी आणि प्रेयसी अनुभवायची असेल तर आपणही स्त्री च्या ह्या प्रत्येक नात्याला जपण्याचा १०० % प्रयत्न नक्कीच केला पाहिजे... नात्यामधील सन्मानच नात्यात स्थिरता आणि जवळीक निर्माण करतो... स्त्री अश्या कित्येक भूमिका सहज रित्या पार पडते.... ती शिक्षित असली तरी वा अशिक्षित असली तरी.... संसारातले असो वा व्यवहारातले प्रश्न किती चूटकीनिशी सोडवते.... घरात रुचकर जेवण बनवणारी अन्नपुर्णा, मुलांना संस्काराचे बाळकडू पाजणारी संस्कारलक्षमी, शिक्षणाचे धडे देणारी सरस्वती ,चालायला बोलायला शिकवणारी माता, पतीने दिलेल्या सुखसोयींवर न जगता त्याच्या खांद्याला खांदा लावुन घर नोकरी सांभाळून घराला हातभार लावणारी अर्धांगिनी, घरातील आजारी व्यक्तींची काळजी  घेणारी आया, घरावरील प्रत्येक संकटांना सामर्थ्याने पेलणारी रक्षिका.... ह्या प्रत्येक भूमिका ती प्रामाणिकपणाने निस्वार्थ मनाने पार पाडते....
         मित्रांनो... स्त्री म्हणजे कुटुंबाचा पाया.... आदिमाया ,आदिशक्ती.. ह्या सगळ्या विशेषणांनी तीला गौरविल जात.... आणि ते उचितच आहे... स्त्रीमुळे कुटुंब बनत, घडत, साकारल जात आणि आकार ही घेत.... प्रत्येक नात्याला घडविण्याचा त्यांना एकसंध ठेवण्याचे काम हे त्या घरातील स्त्रीच करीत असते.... आणि अस असूनही आज मुलगी नको... का तर ती परक्याच धन, दुसऱ्याची वंशवेल वाढवणारी, कुटुंबाचा आधार न बनू शकणारी असा समज आहे.... आणि ह्या गैरसमजातूनच स्त्रीभृण हत्येसारखी महापातक घडत आहेत....
          जो पर्यंत समाजाची ही विकृत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रीला तिचा स्वतःचा असा एकही दिवस गवसणार नाही... आणि स्त्री सबलीकरण होत नाही, तोवर एका पित्याला आपल्या लेकीचा, एका पतीला आपल्या पत्नीचा, एका भावाला आपल्या बहिणीचा दिवस घालायची वेळ येईल... हे सगळ जेंव्हा थांबेल तेंव्हाच स्त्री खऱ्या अर्थाने मुक्त श्वास घेवू शकेल आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.... ॐ श्री गुरुदेव दत्त....

Saturday 1 March 2014


जीवन मार्गदर्शक तत्वे....
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते, तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ट होत नाही….. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते, तेव्हा त्याचे थोडेफार काहीतरी नष्ट होते…. परंतु जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते, तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते.... लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते..... तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.... अशाप्रकारे जे घाईघाईने वर चढू पाहतात ते खूपवेळा कोसळतात हा जगाचा नियम आहे.... म्हणूनच स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.... चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो हे लवकरात लवकर जाणा….. जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.... आयुष्यात काय गमावलंत आणि काय कमावलंत ह्याचा विचार करा..... बघा, बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का..?..
शेवटी सार एकच... तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार..!.. आत्मउद्धार हा ज्याचा त्याने करायचा.... मार्गदर्शक फक्त मार्ग दाखवू शकतो..!!.. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात.... फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते यासाठी मार्गदर्शक मदत करतो..... बघा, आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको..... कारण जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक असते..!... म्हणूनच आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही, सुविचार असावे लागतात....
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे योग्य विचारांचा भक्कम पाया नाही, त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.... आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही....  जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.... पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे योग्यतेने उभी राहतात.... आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवूनध्येयपूर्तीसाठी धडपडणं योग्य आहे.... एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद योग्य विचारांमध्ये असते.... कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी आपणच असतो....  आधी योग्य विचार करा मगच कृती करा आणि ओठी एक पोटी दुजे.... असे वागणे आपलाच ऱ्हास करते....  
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका, चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून व्यवहार खोटे न बोलता सत्याने आणि सन्मानाने करा.... सत्याने मिळतं तेच टिकतं असे गीता सांगतेच, अयोग्य पद्धतीने केलेले काम विविध प्रकारे त्रासदायक होते.... मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.... नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका..... बघा, यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा कधीच होत नाही.... प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो..... गरज असते ती फक्त आपण शिकण्याची, त्या क्षणातील बोध जाणण्याची....
मित्रांनो, मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवावेत कारण  ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.... तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.... म्हणूनच आपल्यातील दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो, हे तत्व जीवनात पाळा.... स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता.... आयुष्यात असं ज्ञान मिळवा जे तुम्हाला आदर्श बनवेल.... एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं..!..

ॐ श्री गुरुदेव दत्त .....