Sunday 16 March 2014


होळी महात्म – होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन......

होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे..... ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे काही आख्यायिका आहेत...

लहान मुलांना पीडा देणार्‍या होलिका, ढुंढा, पुतना ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात.......

एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता...... होलिकेला वर होता की तिला अग्नि जाळू शकणार नाही..... परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले..... तसेच मदनदहना च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात......

हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे..... हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा.... त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी......

आजच्या लोकोत्सवात होळी, धूळवड आणि रंगपंचमी हे तीन मुख्य प्रकार दिसतात..... जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून..... त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने "शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.......

वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना.... होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी..... हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे..... या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा... जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल......

अशी हि होळी सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो ..... सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा .....

ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment