Thursday 30 August 2012

सर्व जीवाचे उदिष्ठ व्हावे साध्य` | स्वामी तुम्हीच सर्वांचे आराध्य

दुर्लभ असा नरदेह जाणावा.... परमार्थी सत्कारणी देह लावावा....
एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात वाद होतो.... लक्ष्मी मातेचं म्हणणं असं असतं, कि.... माणसाचे अस्तित्व असणे आणि आज हे जग चाललय.... ते फक्त माझ्यामुळे म्हणजेच धनामुळे - पैशामुळे.... आज ज्या माणसाकडे पैसा नाही, संपत्ती नाही.... त्याला काही किंमत नाही..... माणूस ओळखतो... जाणतो.... आणि बोलतो ते फक्त पैशानेच... 

यावर विष्णू भगवान हसून म्हणतात कि.... देवी,  असं काही नाहीये.... माणसाला खऱ्या अर्थाने तू अजून ओळखले नाहीस..... पण लक्ष्मी माता येन केन प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते.... कि धनालाच जास्त महत्व आहे.... तरीही विष्णू भगवान मान्य करत नाहीत.... म्हणून लक्ष्मी माता म्हणते... ठीक आहे, मी सिद्ध करून दाखवते.... मग तरी मान्य कराल कि नाही...?

विष्णू भगवान म्हणतात... हो हो चालेल.... त्यावर लक्ष्मी माता पृथ्वी वरील एक दृश्य दाखवते.... एक शोकमग्न अंत्ययात्रा चालली असते.... लक्ष्मी माता आकाशातून धनाचा वर्षाव सुरु करते.... आणि लगेच अंत्ययात्रेतील सगळे लोक आपण कुठे जातोय.... हे विसरून पैसे गोळा करू लागतात.... लक्ष्मी माता भगवान विष्णूंकडे पाहत म्हणते.... पाहिलंत...? धनासमोर माणूस आपण कोणाला तरी कायमचे गमावून बसलोय हे दुखः देखील विसरतो.... 

अगं पण त्या चौघांच काय...? जे मृत देहाला खांदा देऊन आहेत....? ते तर नाही ना वाकले पैसे उचलायला...? विष्णू भगवान हसत म्हणाले..... लक्ष्मी माता म्हणाली, " ठीक आहे..... आता हे बघाच.... एवढे म्हणून लक्ष्मी मातेने खांदा दिलेल्या त्या चौघांसमोर धनाचा वर्षाव सुरु केला..... त्या चौघांनी प्रेत बाजूला ठेवलं..... आणि जमेल तितके पैसे गोळा करायला सुरुवात केली..... 

यावर लक्ष्मी मातेने आपण जिंकलो या अविर्भावात भगवान विष्णूंना प्रश्न केला.... स्वामी आता तरी पटलं कि नाही....? माणसासाठी मी म्हणजेच सर्वकाही.... देवी, अजून ही एकजण बाकी आहे..... दृश्याकडे पाहत विष्णू भगवान म्हणाले.... तो जो तिरडीवर झोपलाय.... तो तर नाही उठला हे धन - पैसे उचलायला...?  लक्ष्मी माता म्हणली.... तो उठेल तरी कसा...? तो मृत आहे.... त्याच्या शरीरात आत्माच नाहीये.... 

तत्क्षणी भगवान विष्णू म्हणाले.... देवी, हेच तर सांगायचं मला.... जो पर्यंत मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला म्हणजेच धन संपत्तीला मान आणि किंमत.... आज मनुष्य या मायारूपी धनाला भुलतो व मला विसरून नरदेह फुकट घालवतो..... ज्या क्षणी मी मनुष्य देहातून अंतर्धान पावलो.... त्या क्षणी त्या मनुष्यासाठी पैसा मातीमोल नव्हे का....

तात्पर्य : बघा हे अगदी खरे आहे..... आणि माणसा बद्दल हेच तर आश्चर्य आहे कि तो धन संपत्तीसाठी आपले जीवन पणाला लावतो.... पण मग तोच पैसा त्याचा जीव का नाही वाचवू शकत....? आज माणूस आयुष्य जगताना असा जगतो कि कधीच मरणारच नाही..... आणि मरताना असा मरतो कि कधी जगलाच नाही.... 

यावर नक्कीच विचार करायला पाहिजे.... आणि म्हणूनच पैश्यापेक्षा सुद्धा लाख मोलाचा असलेला आपला सजीव देह सत्कारणी लावावा.... आता प्रपंच काय किंवा परमार्थ काय, काहीही करताना हा देह आवश्यकच आहे.... आणि सजीव देहाशिवाय माणसाला काहीच करता येत नाही.... हा जो मानवी देह आहे.... तो माणसाला काही सुखासुखी प्राप्त झालेला नाही.... या जगातील चौर्‍यांशी लक्ष योन्यांत जन्म घेता घेता नर-तनु प्राप्त झाली आहे.... म्हणूनच समर्थ रामदासांनी सांगितले आहे....

बहुता जन्मांचा शेवट.... नरदेह सांपडे अवचट.... नरदेह संसारी.... परम दुर्लभ असे....
नाना सुकृतांचे फळ.... तो हा नरदेह केवळ.... जन्मा आलियाचे फळ....कांही करावे सफळ.... 
पाप पुण्य समता घडे.... तसेच नरदेह जोडे.... नरदेहाचे उचित.... काही करावे आत्महित.... ( समर्थ दासबोध ) 

म्हणजेच या संसारात नरदेह हा फार दुर्लभ आहे नाना सुकृतांचे फळ या स्वरूपात नर-शरीर लाभते..... पाप-पुण्य जेव्हा समान होते, तेव्हाच आपल्याला नर-तनूची प्राप्ती होते.... म्हणूनच असा दुर्लभ नरदेह मिळाल्यावर तो आपण सफळ केला पाहिजे.... नरदेह प्राप्त झाला असता, त्याला उचित असे आत्महित साधून घ्यावयास हवे.... आणि आत्महित करावयाचे म्हणजे परमार्थ करावयाचा.... देहाचा उपयोग जर परमार्थांसाठी केला तरच त्या शरीराचे-देहाचे सार्थकच होणार आहे.... व परिणाम स्वरूपी देह बंधनातून मुक्त होऊन आत्मरुपात विलीन होईल....

ॐ श्री गुरुदेव दत्त....



स्वामी प्रार्थना : 

सर्व जीवाचे उदिष्ठ व्हावे साध्य` | स्वामी तुम्हीच सर्वांचे आराध्य | नित्य वंदावे तव पाद्य | नमोनिया त्रिकाळी ||१||
सानिध्य लाभले तव चरणाचे | भाग्य उजळले शरणागताचे | भेद मिटले जन्मान्तराचे | जगण्याची हीच इच्छा ||२||
तव इच्छेनेच घडती जनभेटी | असो सभोवती सज्ज्नांची दाटी | भिऊ नको मी तुझ्या पाठी | ऐकून घडते दर्शन तुमचे ||३||
जे काम हाती आले | त्यातूनच साधावे भले | डोळे आश्रुनी व्हावेत ओले | तव चरणक्षालनासी ||४||
इच्छेची तुमच्या आवाज्ञा नसावी | हीच दक्षता अंगी यावी | मलीनता निघोनी जावी | सत्वर तव कृपेने ||५||
तुम्ही इच्छिलेले कर्म | तोच असावा आमचा धर्म | तव सेवेचे जाणुनी वर्म | वर्तत असावे सदा||६||
जो तुम्हाला आहे त्याग | तोच मनी नसावा भोग | हा वरकरणी आहे रोग | नसावी हानी काही ||७||
सकार बोलण्याचा परिणाम | करतो तुमच्या दर्शनाचे काम | नित्य असावे आमही ठाम | तव दर्शनासी ||८||
तुम्हीच आमचे राम | तुम्हीच आमचे शाम | तुमच्या चरणीच चारी धाम | आम्ही असू दर्शनाभिलाषी ||९||
अनुसंधान साधते सुविचाराने | त्रस्त होतो जीव कुविचाराने | दोन्ही येते तुमच्या इच्छेने | आता करवून घ्यावे योग्यते ||१०||
अज्ञानाची हि आपत्ती | वाढवते ज्ञानाची संपत्ती | त्यात दर्शन हीच प्राप्ती | तळमळ नित्य असावी ||११||
कष्ट अपार घडो ज्ञानासाठी | तो संचय असावा देण्यासाठी | झोळी फाटकी नसावी घेण्यासाठी | कदापीही ||१२||
जनास रुचेल तेच मी द्यावे | सर्वांतच तुम्हाला पहावे | परोपकारासाठीच जगावे | सर्वकाळ ||१३||
अनुभव जनाचे हेच दर्शन | त्यात मानाचे नसावे आकर्षण | तरीच होईल पुनर्वषण | तव कृपेचे ||१४||
कार्मातुनच मिळावे ज्ञान | शंकेचेही व्हावे समाधान | फुकाचा नसावा अभिमान | कष्टातुनी आता ||१५||
तुमच्या कृपेने संचय होवो | वितरणात निस्वार्थ राहो | अहंभाव हि सरो |.आत्मसुखासाठी ||१६||
भेटणाऱ्यातच आमचे भले असे | न मिळणारे कामाचे नसे | तेथे हि टिकावे सेवेचे पिसे | नम्रतेने स्वामीराया||१७||
मर्यादित यशाची व्यथा | असे आमुची कमतरता | यातही तुमची उदारता | व्हावे आम्ही महान ||१८||
ज्यांची मजप्रती अपेक्षा | त्यांची न व्हावी उपेक्षा | तुमच्या आशीर्वादाची भिक्षा | चोख व्यवहारा साठीच ||१९||
स्वार्थापोटी नको फसवणे | उदिष्ठा साठी नसावे अडवणे | देहास हि दंड देणे | नसावे कृत्य आमचे||२०||
क्षमावा हा अपराध | इच्छेला तुमच्या द्यावी दाद | सत्कर्मासाठी नको वाद | अनुसंधान साधावे||२१||
अव्दितीय असे तुमचे देणे | आता संयमा वाचून न रहाणे. |तुमचा कौल आहे घेणे | हानी टळण्या वळणावरी ||२२||
अभिमानाची व्यथा न जडो | परोपकार सतत घडो | सत्संगती सदा वाढो | इच्छा माझी स्वामिया ||२३||
उगाच नको तर्क वितर्क | फसवणुकीने होउ नये गर्क | सत्वाचाच पीत असावा अर्क | तव कृपेने स्वामीराया||२४||
अपात्र म्हणुनी नका दूर लोटू | मग तुम्हावीण कोणास भेटू? | दु:ख हे कोणासवे वाटू ? | स्वामीराया ||२५||
तव आशीर्वाद असे माझा श्वास | तव चरणाशी नम्र हा दास | आम्हा न करा उदास | प्रभो कालत्रयी ||२६||
दुष्कर्माच्या भोगाचे फटके | नसावे परी रहाटके | रागावणे असावे लटके | ठेऊन तळाशी प्रेमभाव ||२७||
जर नको ते घडले | तरी काही कमी न पडले | मात्र तुमच्या कृपे वाचून सर्व नडले | राहो सदा स्मरणात||२८||
हेच ठसावे मनात | तरच योग्य मी जनात | तव सेवेचा ध्यास स्मरणात | अखंड वसो ||२९||
माझी न योग्यता | तुम्ही निवाराव्या सर्वच खंता | अभिमानाने सर्व नासता | कर्म गहन मी म्हणतसे ||३०||
येथे खुंटते माझी प्रगती | वेळेच्या सदुपयोगाने मिळावी गती | अनुसरावी योग्य नीती | साधावया हित माझे ||३१||
हि आहे मनीची व्यथा | दासाच्या जीवनाची रंगवा कथा | नतमस्तक होऊनी ठेवितो माथा | चरणावरी स्वामिया ||३२||




No comments:

Post a Comment