Tuesday 19 March 2013

रंगपंचमीला ड्राय होळी खेळा.....

मित्रांनो, होळी साजरी करताना हे विसरू नका.... महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ.... पाण्याच्या एका थेंबापासून लाखो लोक वंचित.... शेतकरी ठरतोय दुष्काळाचा बळी.... 

मित्रांनो... रंगाचा सोपस्कार जरूर असू द्या.... पण पाण्याची नासाडी नकोच.... बघा, या गोष्टीला मुळात धार्मिक रंग द्यायची गरजच नाही..... हा आपला सण आहे ना.... पण मग ओता पाणी असा अविर्भाव नको.... आज दुष्काळाने पाण्यावाचून मरताहेत ती माणसे पण आपलीच आहेत.... आज काही मंडळी इथे फक्त पैसे कमवायला आहेत.... त्यांची मुले नंतर परदेशात जाऊन रहाणार.... इथे राहायचं ते आपल्याला.... मग या मातीचा विचार आपणच करायचाय.... आपल्याला जे शक्य आहे ते करा.... दुसऱ्याकडून अपेक्षा करून काही होणार नाही.... 

बघा, पाण्यावाचून लोक मरतात म्हणून काय आपण आंघोळ करणे थांबवायचे का..?.. लोक उपाशी मरतात म्हणून काय आपण उपाशी राहायचे का..?.. म्हणजेच असा प्रयत्न पाहिजे जेणेकरून "पाण्याची / अन्नाची नासाडी नको व्हायला" इतकीच अपेक्षा..!.. म्हणूनच 'सोपस्कार' शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे.... म्हणजेच धुळवडीला पाण्याची नासाडी आणि उधळपट्टी करणारे रेन डान्स सारखे कोणतेही प्रकार नको.... आपल्या सणाला महत्व असावेच.... पण त्याचे अवडंबर कदापी नको.... 

बघा, दुष्काळासारखी कोणती ना कोणती विपरीत परिस्थिती सतत येत राहणारच.... आपण केवळ दार बंद करून घेऊन काय साधणार आहोत..?.. यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे.... युवकांनी बुद्धीमत्तेच्या बळावर संघटितपणे संघर्ष करून राष्ट्र घडवले पाहिजे.... युवकांमध्ये सुधृढ राष्ट्र घडवण्याची क्षमता असतेच.... युवकांनो जागे व्हा... संघटीत व्हा... वैचारिक परिवर्तनासाठी जनजागृती करणे तुमच्याच हाती आहे.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment