Friday 4 October 2013

जसा काळ बदलतो तसे अनेक गोष्टींमध्ये बदल होतातच.... पण ज्ञानी साधक स्वःताच्या व इतरांच्या जीवनातील सर्व दु:खे, शारीरिक पिडा, अपमानाचे प्रसंग, कठोर शब्द-वागणूक.... यांस निश्चलतेणे सामोरा जातो.... तो यावर कोणालाही काही बोलत नाही.... उलट माझी भक्ती वाढावी.... हाच खरा परीक्षा काळ.... म्हणून ईश्वराच्या इच्छेनेच हे घडते आहे असे तो म्हणतो.... दु:ख – भोग त्याला घाबरवू शकत नाही.... तो आपले मन अधिकाधिक ईश्वराकडे लावून अशा प्रसंगाचा उत्कृष्ट फायदा करून घेतो.... मन नामात गुंतवून भगवंत अनुसंधानी लावतो.... म्हणूनच.....

नामस्मरणी अखंड रहावे | नित्य रामानुसंधानी असावे ||
वाईट कुविचार दुर्लक्षावे | नामे निर्मळ समाधान साधावे ||    ..... ॐ श्री गुरुदेव दत्त.....


No comments:

Post a Comment