Monday 2 July 2012


गुरु बोध मधील एका जेष्ठ साधकांनी खालील प्रश्न विचारलेला.... त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.....

प्रश्न :-अनुग्रह घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे असते  तो घेतल्यावर काही बंधने असतात का ? हे कृपया सविस्तर सांगावे……. 

अनुग्रह घ्यायचा म्हणजे आपण ध्येय (मोक्ष - भगवंत प्राप्ती) ठरवायचे व ते प्राप्त करण्यासाठी गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करायचे..... अनुग्रह घ्यायचा म्हणजे आपण आपला प्रवास कसा करायचा ते गुरु कडून माहित करून घेणे....... अनुग्रह म्हणजे जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र म्हणजे संकल्प , प्रयत्न , अनुग्रह म्हणजेच यश होय...... ध्येयाशिवाय जीवन जगणे.... कोठे जायचे माहित नसतांना प्रवास करणे होय...... ध्येयच तुम्हाला तिथपर्यत पोहचण्याची क्षमता देतो...... आणि आनंदाने जगण्याची शक्तिही देतो....... 

आपल्याला ध्येय प्राप्त करण्याकरीता केवळ संकल्पच घेऊन चालत नाहि...... तर ते साध्य करण्याकरीता इष्ट प्रयत्न करणेही आवश्यक आहे........या संकल्प व प्रयत्ना सोबतच गुरुचा अनुग्रहही आवश्यक आहे....... 

गुरुंनी अनुग्रहानी आपणास त्यांच्या परंपरेत सामावून घेताना त्यांनी एक कुठला तरी मंत्र दिला असेल....... तो मंत्र म्हणजे स्वतःच्या साधनेने सिध्द केलेले जिवंत शब्द असतात...... गुरुंनी असा सामर्थ्यवान मंत्र आपल्याला देऊन परमकृपा केलेली असते...... गुरुनी आपल्याला अनुग्रह देऊन व आपला अंगीकार करण्यात...... म्हणजे आपल्यात `स्वतःमध्ये स्वरुप ओळखायची क्षमता आहे’ हा विश्वास दाखविला आहे........ सद्‍गुरूंचा अनुग्रह मिळणे हा एक योग आहे...... 

परमार्थाची सुरुवात गुरूच्या अनुग्रहाने..... सद्‍गुरूच्या कृपेने होते...... परमार्थात अनुभव येण्यास सद्‍गुरूंची कृपा व्हावी लागतो..... कारण गुरु अनुभवी असल्याने ते आपल्याला तो अनुभव देऊ शकतात...... 

तसेच अनुग्रह घेतल्यावर काही बंधने येणारच....ती पाळावीत...... नाहीतर ध्येयप्राप्ती कशी होईल.......यात सद्‍गुरूंनी सांगितलेल्या साधनाचा अभ्यास करणे हे अत्यंत आवश्यक आहे...... त्यावरच सर्व काही अवलंबून आहे...... 

गुरूमंत्राच्या नियमित जपाने...... साधनेने आध्यात्मिक प्रगती होते...... "गुरूविन कोण दाखवील वाट'....... ते यासाठीच...... गुरुंच्याकृपेने हे सहज साध्य होते...... यासाठी वणवण भटकावे लागत नाही..... अनुग्रह ही आत्मज्ञान प्राप्तीसाठीची पहिली पायरी आहे...... सद्‌गुरूंच्या कृपेने शिष्य या पायऱ्या सहज पार करतो...... शेवटी मोक्ष - भगवंत प्राप्ती ......

मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा…. असे काहीजण म्हणतात….. 'मी' केले ही जाणीव आड येते…. म्हणून सद्गुरूची, अनुग्रहाची आवश्यकता आहे….. अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार….. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला….. म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले…… 

ॐ श्री गुरुदेव दत्त.......

No comments:

Post a Comment