Sunday 22 July 2012


आयुष्याचे ध्येय धोरण ठरवा.... आयुष्याला आकार द्या.....

आज विचार करावा.... आपल्या आयुष्यात ध्येय, काही उद्देश आहे कि नाही.... आपण ध्येय मार्गावर कसे चालत आहोत..... आपल्या ध्येय व उद्देश यांच्यासाठी प्रामाणिक असणार्‍यांना येणार्‍या अनंत अडथळे, अडचणीच त्या ध्येय-उद्देशाप्रती आणखी घट्ट बांधुन ठेवतात नाही का....  पण आज विचार केला ज्याच्याकडे ध्येय-उद्देशच नाही...... अशीच लोक मग येणार्‍या अडथळे, अडचणीतच गांगरून जातात.... स्वतःचे आयुष्य या अडचणीतुन कसे बाहेर येणे एवढेच मानतात… सारे जीवन यासाठीचा मार्ग शोधण्यात घालवतात..... आता या जगण्याला आयुष्याला काही उद्देश आहे का..? गोंधळात टाकणारा प्रश्नच नाही का.… 

पण जर आपण थोरा-मोठ्यांची चरीत्र बघितली तर हेच कळुन येईल... की ध्येय त्यामागचा उद्देशच माणसाला महान ठरवतो..... तिथे किती आयुष्य जगले याला महत्व नसते….. बघा ना, अवघ्या २३ व्या वर्षी फाशीवर जाणार्‍या भगतसिंगांचा ध्येय-उद्देश भारताचे स्वातंत्र्य’ होता व त्या उद्देशाप्रती ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक राहीले….. स्वामी विवेकानंद अवघ्या ३९ वर्षी जग सडून गेले.... पण आजही त्यांचे विचार ध्येय उद्देश सर्वाप्रती जागृत आहेतच.... तसेच  शिवाजी महाराजांचे..... आयुष्याची अवघी ५३ वर्षे जगले.... पण आज ४ शतकानंतरसुद्धा व येणार्‍या कित्येक शतकांमध्ये सुद्धा त्यांचे उद्देशाप्रती असणारे प्रेम व त्यांची किर्ती जागृत राहील….. 

मित्रहोआपल्या आयुष्याला ध्येय-उद्देश आहे का..तो असलाच पाहीजे हे  माझे ठाम मत आहे…..  फक्त काळाच्या लाटेवर आरूढ होण्यात काहीच उपयोग नाही… आपल्याकडे जगण्याचा उद्देश असलाच पाहीजे.... आपल्या अंगी तो रुजला पाहिजे....आज बर्‍याच जणांची विचारधारणा अशी असते की आपण सामान्य आहोत अन सामान्य माणसाप्रमाणेच आयुष्य जगायचंय उगीचच नको त्या मार्गी का लागावे..... पण विचार करावा, आपण खरेच सामान्य आहोत..आज जर आपण आपल्या व्यवसायीक जीवनामध्ये एवढी प्रगती करु शकलो तरी आपण असा विचार का करतो..?? मग एखाद्या खेडुताने काय म्हणावे...की सामान्य म्हणवुन घेऊन वास्तुस्थितीला दुर सारण्याचा प्रयत्न करीत असतो आपण….. आपलेच विचारमंथन झाले पाहीजे… 

आत्मपरीक्षनाने स्वःताला प्रश्न विचारण्याची हिम्मत अंगात आली पाहीजे… कोणत्याही वाईट बिकट परीस्थितीला मनासारखे वळवुन त्यातुन आपले हित साध्य करता आले पाहिजे.... सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेणे जरुरी आहे…. ती म्हणजे कि आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे……. आपले ध्येय सहजासहजी आपल्याला साध्य होणार नाही….. हि गोष्ट लक्षात ठेवणे जरुरी आहे तरच आपण आपले लक्ष्य गाठु शकता..... 

आता या ध्येय धारणेमध्ये संगत फार महत्वाची ठरते..... संगत चांगली नसेल तर ध्येय-उद्देश मागे पडतात.... म्हणून असंगाशी संग नको..... बघा ना, वाळवंटामधील प्रत्येक रेतीच्या कणाला अस्तित्व नसतेच.... पण बर्‍याच कणांपासुन तयार होणार्‍या रेतीच्या क्षणभंगुर डोंगरांनाही अस्तित्व नसतेच.... जर आपल्याकडे उद्देश नसेल आणि आपण इतर उद्देश नसलेल्यांबरोबर जगलो तर आपलेही या वाळवंटातील डोंगराप्रमाणेच होणार यात बिल्कुल शंकाच नाही... आपलेच अस्तिव राहणार नाही....

समर्थांनी याकरताच म्हंटले आहे.... सदा संगती सज्जनाची घडो.... म्हणुनच जर बाकी काहीही करता आले नाही.... तरी आपली सोबत वा संगत ही तरी आदर्श असावी….. उदाहरण द्यायचे झाले तर.....  मांडवाचे सगळेच बांबु डळमळीत असेल तर तो मांडव ढासळणारच हे नक्की..... पण तेच जर त्यातील एकच बांबु थोडा डळमळीत असेल.... तर मात्र तो मांडव इतर मजबुत वाश्यांच्या आधारे उत्तमस्थितीत राहतो….. आयुष्याचेही असेच आहे नाही का..... जर आपणही भरकटलेल्यांबरोबर राहू तर फक्त भरकटणेच हाती येईल…..  दुर्दैवाने बाकी काहीच नाही.... 

आज पालकांनाच जर वैचारीक बैठक नसेल.... तर मुलांचे संगोपन आदर्श होईल का ?  मुलांना योग्य ते संस्कार मिळतील का ? नाही, कदाचित त्या लहानग्याच्या भविष्याचा मांडव डळमळीत होण्याचा संभव..... इतिहास काय सांगतो... जिजाऊंनी शिवाजी घडवला… पण याहीआधी जिजाऊ घडलेल्या होत्या.... हे आपण विसरून कसे चालेल.... म्हणूनच भविष्यात जर सर्वांगीनदृष्ट्या विकसित नेतृत्व दिसायचे असेल.... तर पुढे येणार्‍या पिढ्यांना अध्यात्मिकशारीरीकमानसिकतांत्रिकशैक्षणिक असे सारे पर्याय  उपलब्ध  करुन दिलेच पाहीजेत.... ते सर्व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे.... 


यासाठीच आजच आत्मपरीक्षनाने, आत्मनिरीक्षणाने स्वःतात आत्मसुधारना करा.... आपले स्वःताचे वेगळेपण ओळखा.... ते जपा त्याला फुलू द्या.... एक ध्येय, जीवनाचा उद्देश उराशी बाळगा.... एक ध्येय, प्रेरणा, विचार नसेल तर आपली प्रगती होत नाही.... ध्येय आणि संयम ठेवा.... बघा, यश तुमचेच असेल..... चला तर आपणही आपले ध्येय निश्चित करू या ..... उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.... एखादे ध्येय निश्चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल.... तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो..... तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.... परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.....योग्य तेच ध्येया निवडा.... एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.....  

जसे management / corporate world , ध्येय वा Goal setting वर चालते ......आपल्याला थोड्याफार फरकाने व्यक्तिगत आयुष्यातही त्याच तत्त्वावर मार्गक्रमण करता येऊ शकतं..... असं मला वाटतं..... दुसरं म्हणजे ध्येय साध्य झाली नाहीत..... तरी नाउमेद न होता तितक्याच जोमाने आपला मार्ग शोधत राहणं आणि पर्यायाने एका विशिष्ठ दिशेने आयुष्याची वाटचाल होणं अधिक महत्त्वाच आहे असं वाटतं...... उदाहरण घ्यायचं म्हटलं तर..... जसे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे टिळकांच स्वप्न वा ध्येय होतं..... ते त्यांच्या हयातीत पूर्ण झालं का? नाही..... पण त्या ध्येयासाठी त्यांच्या हातून जे महत कार्य झालं ते महत्त्वाचं..... अर्थात मोठ्या माणसांच्या गोष्टीच वेगळ्या असे जरी मानले.... तरी पण सामान्य माणसाने स्वतःसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना..... त्याच्या आयुष्यातली असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड केली तरी.... त्याच्या आयुष्याला अर्थ येउ शकेल असे नक्कीच वाटते.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त ......


No comments:

Post a Comment