Tuesday 3 July 2012

ग्रंथ हेच गुरू......

आज विचार केला तर.... प्राचीनकाळी आपल्या येथील शिक्षण संस्था प्रामुख्याने मौखिक परंपरेला मानणारी होती.... विद्याभ्यासही मौखिक परंपरेने चालत आलेला..... आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा होता...... पुढे काळाच्या ओघात छपाईची कला अवगत झाली..... आणि पूर्वासुरींचे हे मौखिक विचारधन छापील स्वरूपात कायमस्वरूपी बंदिस्त झालं...... 

बघा, आपल्या आयुष्यातील शैक्षणिक कालखंडात आपल्याला गुरूचा सहवास लौकिक अर्थाने फक्त विद्यादानाच्या रूपानेच लाभतो.... आणि तोही ठराविक कालावधीसाठी..... मात्र त्यापुढील उर्वरित आयुष्यात आपल्याला भासणारी गुरूची उणीव ग्रंथरूपाने दूर होते नाही का..... 

विविध विषयांवरचे हे ग्रंथ / पुस्तके आपल्याला गुरूरूपाने मार्गदर्शन करतात..... दिशादर्शक म्हणून कार्य करतात..... या ग्रंथांचे महत्त्व पूर्वीच्या काळीही होते आणि आजही तितकेच अबाधित आहे..... जगभर तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असला.... आणि हे जग संगणकाच्या व्याप्तीमध्ये सामावणारं असलं.... तरीही ग्रंथांचे महत्त्व कमी होणार नाही....

वाचाल तर वाचाल.... हे वाक्य काही उगाच नाही.... तर ग्रंथ / पुस्तकासारखा मित्र नाही...... प्रतिकूल परिस्थितीतही चांगले जीवन घडवण्याचे काम ग्रंथ / पुस्तके करतात....... विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करुन ज्ञान ग्रहण करायला हवे.,,,,, साहित्याकडे डोळसपणे पाहिल्यास उत्तम भवितव्य घडते....

पुस्तके समाजाला घडवतात..... ग्रंथ / पुस्तकांचा वास जगण्याचा आनंद देतात...... आपला पुस्तकसंग्रह वाढवा व स्वत:चं असं एक लघुग्रंथालय विकसित करा..... एखाद्या ग्रंथसंग्रालयाचे सभासद व्हा आणि आवडती पुस्तके वाचून काढा..... देशोदेशी फिरल्याने माणूस समृध्द होतो त्याचप्रमाणे.... वाचनाने माणूस समृध्द होतो....... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment