Wednesday 4 July 2012

तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला..... महारुद्र... बाजीप्रभू देशपांडे.....
पन्हाळगडची लढाई.....

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडावर सुखरूपपणे पोचणे..... हा एक रोमहर्षक आणि धाडसी प्रसंग....... या प्रसंगी आपल्या महाराजांसाठी जीव ओवाळून टाकणारे लाखमोलाचे बाजी प्रभू देशपांडे एक साक्षात हौतात्म्यच......

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता..... यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते...... मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.... या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला..... त्यामुळे सिध्दी गाफील राहिला..... शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला..... शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले..... तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते......

छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर.... सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले..... व त्यांचा पाठलाग चालू झाला..... मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले..... अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत..... तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले......

हे सार इतक सोप्प नव्हतच.... केवळ ३०० मावळे घेउन सिद्धीच्या फौजेशी लढने सोप्प नव्हत.... पण बाजी लढले..... कळी काळाच्या हि उरात धडकी बसेल.... अशा आवेशात लढले..... साक्षात मृत्यूने त्या घोड खिंडीत तांडव घातले..... घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली..... शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला......

सिद्धीला बाजीला थोपवण भारी जात होत.... आणि काळान डाव साधला बंदुकीची गोळी वर्मी लागली...... आधीच जखमांनी बाजींच्या देहाची चाळण उडाली होती..... परंतु विशाल गडावरून काही ईशारति होत नव्हत्या..... आणि बाजींचा देह काही केल्या खाली पडत नव्हता...... पराक्रमान हि लाजून तोंडात बोट घालावी असा पराक्रम बाजी गाजवत होता..... आणि महाराज गडावर पोहचले..... ईशारति झाली तोफांचे आवाज झाले......

महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला..... इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला......आणि बाजींनी देह ठेवला.... घोडखिंड पावन खिंड झाली बाजींच्या रक्ताने पावन झाली.... बाजींच्या निष्ठेने पावन झाली..... या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले..... तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले..... बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.....

साक्षात मृत्यूलाही जरा थांब...... माझा धनी गडावर पोहचला नाही तोपर्यंत...... मी हि मरणार नाही असे सांगणारे बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाला वंदन......

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment