Sunday 8 July 2012




स्वामी प्रभुपाद…… एक अव्यक्त व्यक्तिमत्व…… 

बघा ना, आज आपण काय चित्र पाहतो… यशाचे धनी सगळेच असतात…. पण अपयशाचा धनी मात्र एकच असतो…. जेव्हा तुमच्या जीवनात अपयश तुमची पाठ सोडत नाही… तेव्हा तुमचे सगे सोयरे आणि मित्रच नव्हे तर तुमची पत्नी आणि मुले देखील तुमच्याकडे पाठ फिरवतात हे एक कटू सत्य आहे…..

स्वामी प्रभुपाद वयाच्या 57 व्या वर्षापर्यंत नुसता संघर्षच करत राहिले…… तेव्हा या सर्वानीच त्यांच्याकडे पाठ फिरवली…. वयाच्या 69 व्या वर्षापर्यंत हा संघर्ष संपलाच नाही…. परंतु पुढल्या 12 वर्षात त्यांनी जो इतिहास घडवला, त्यामुळेच आज जगभरातील शाळातील 10-12 लाख गरीब मुलांना दररोज दुपारचे जेवण मोफत दिले जाते….. दर वर्षी हि संख्या एक लाखाने वाढतच जाणार आहे…. कारण प्रभुपाद स्वामिना गरिबान विषयी अपार स्नेहभाव होता, हे त्यांच्या लाखो अनुयायांना माहित आहे…..

कलकत्त्याचे एक व्यापारी व्यापारात अपयशी ठरले….. कारण त्यांचे सारे लक्ष कृष्ण भक्तीकडेच लागलेले असायचे….. त्यामुळे समाजात नेहमीच ते चेष्टेचा विषय ठरायचे….. कृष्णभक्तीचा प्रसार पुस्तक लिहून जगभर करायचा आणि कृष्णाची मंदिर जगभर बांधायची असं स्वप्नं ते जागेपणीच बघायचे…. त्यामुळे शेवटी शेवटी तर त्यांना घरातल्यानीही वाळीत टाकले….. तेव्हा खिशात दिडकी नसताना वयाच्या 69 व्या वर्षी ते कोणीतरी दिलेल्या बोटीच्या तिकिटाने महिनाभर प्रवास करून अमेरिकेला गेले…..

आपल्या अमोघ वाणीने आणि अथक परिश्रम घेऊन लिहिलेल्या पुस्तकांनी त्यांनी अशी काय जादू केली कि….. सुरुवातीला हजारो आणि नंतर लाखो परदेशी युवक कृष्ण भक्ती मध्ये तल्लीन झाले….. हृदय विकाराने ते त्रस्त होते…..  तरीही त्यांच्याकडे प्रचंड इच्छा शक्ती आणि आत्मविश्वास होता… त्यामुळे पुढेही अपार संघर्ष करून त्यांनी पुढल्या 12 वर्षात कृष्ण भक्तीचा प्रसार करून जग भरात 110 एकाहून एक सुंदर कृष्ण मंदिर बांधली…. आणि आपलं स्वप्नं खरं करून दाखवलं….. आज जगभर इस्कोनने बांधलेली ३५० हून अधिक कृष्ण मंदिर आहेत….. त्यांनी स्वतःला कधी भगवान न मानता कृष्ण भक्तच मानले……

जगातील 6 खंडामद्धे जाऊन कृष्ण भक्तीचा प्रसार करणारे स्वामी प्रभुपाद इस्कॉन म्हणजेच हरे कृष्ण आंदोलनाचे संस्थापक आहेत…. 1977 मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचे निधन झाले….. त्यांनी लिहिलेल्या भगवत गीतेवर हल्लीच रशिया मद्धे बंदी घातली जाणार ह्या बातमीने ते चर्चेत आले….. भागवत गीतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या 70 हून अधिक पुस्तकांचे भाषांतर जगभरातील 76 भाषांमध्ये झालेले आहे….. 1996 मध्ये टपाल तिकीट काढून सरकारने त्यांच्या 100 व्या जयंतीला त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली…..

त्यांच्या निधनाला 34 वर्ष झाली…. तरी आजही उच्च शिक्षण घेतलेले आणि महिना 4-5 लाखापर्यंत पगार घेणारे….. असंख्य युवक आज नोकरीला लाथ मारून प्रभुपद स्वामींचे कार्य नेटाने पुढे नेत आहेत….. आणि भगवत गीतेचा प्रचार जोमाने करीत आहेत….. त्या सर्वांनाच आपण शुभेच्छा देऊया….. आणि त्या लाखो मुलापैकी मुंबईतील महापालिका शाळामधील  किंवा इतर गरीब मुलांना आपणही कधीतरी भोजन घालू…. असा नवीन संकल्प करूया….

 ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment