Monday 15 October 2012


आदर्श ठेवावा उत्तम.... ध्येय असावे सर्वोत्तम.... व्हावे सर्वगुण संपन्न.... देश बलशाली परिपूर्ण....     
  मित्रांनो,  आज आपण २०११ चे रेमन मेगासेसे अवार्ड विजेत्या नीलिमा मिश्रा यांचे व्यक्तिमत्व जाणूया.... २०११ चे रेमन मेगासेसे अवार्ड विजेत्या नीलिमा मिश्राने रोख २६ लाखाचे पारितोषिक काय केले असेल..... ? तिने ती सारी रक्कम चक्क समाजालाच अर्पण केलीय..... पुढे कधी २ कोटी मिळाले.... तरी मिश्राबाई ती सर्व रक्कम समाजासाठीच अर्पण करतील यात शंकाच नाही..... बघा, एकीकडे हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या राज्यकर्त्यांमुळे आपला देश बदनाम होतोय.... तर नीलिमा मिश्रा सारख्या असंख्य लोकांमुळे तो जगाच्या नजरेतही भरतोय..... 

   लहानपणापासून नीलिमा मिश्रा यांचे एकच ध्येय होते.... समाजासाठी काहीतरी करणे.... " मोठी झाल्यावर मी माझ्या गावाचा विकास करण्यासाठी धडपड करीन.... " असे शाळेत जाणारी जळगाव मधली एक १३ वर्षाची मुलगी.... जेव्हा आपल्या मैत्रीणीना सांगायची.... तेव्हा सर्वांनाच तिची खूप गम्मत वाटायची.... पण बघा, आज २५ वर्षानंतर नीलिमाने गावातीलच नव्हे.... तर शेजारच्या गावातीलही हजारो स्त्रियांना १८०० बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं केलंय..... 

   तशी प्रत्येक महिलेमध्ये सुप्त शक्ती असते..... तिला जागृत करणे महत्त्वाचे असते.... महिला शिकलेल्या नसल्या तरी त्यांच्यात निसर्गाने शक्तीचा स्रोत भरलेला असतो..... त्या व्यवहार प्रामाणिकपणे करतात व प्रचंड मेहनत घेतात.... ग्रामीण भागातील महिलांबरोबर चर्चा करताना त्यांच्या कल्पना भन्नाट असल्याचा अनुभव तेथे काम करणाऱ्याना नेहमीच येतो.... बघा, परिश्रमाला जर नितीमत्तेची जोड असेल तर तुम्हाला यश जरुर मिळेल.... याचेच उदाहरण नीलिमा मिश्रा यांनी आपल्या समोर ठेवले आहे...... समाजातील उपेक्षितांना एका धाग्यात ओवले.... म्हणूनच त्यांच्या पदरी यश आले आहे..... त्यांचे हे यश भावी पिढीला प्रेरणादायी आहे..... 

   आज उपेक्षित असलेल्या वर्गासोबत काम करणे कठीण आहे..... आणि नीलिमा मिश्रा यांनी ते करून दाखवलं आहे..... त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य अतुलनीय आहे..... उपेक्षा आणि दारिद्रयातून स्त्री बाहेर आली तर ती जागतिकीकरण करू शकते.... नीलिमा मिश्रा यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले..... महिला शक्तीला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले...... या बळावर जे काम उभे राहिले त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली आहे..... आता आपली जबाबदारी आहे हे असे काम करणाऱ्याना मदत करण्याची, प्रोत्साहन देण्याची, त्यांच्याबरोबर काम करण्याची..... समाजाला आपलेही काही योगदान देण्याची..... 

   मित्रांनो.... आपल्या भारताची शोकांतीका म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्यांची संख्या वाढते आहे..... समाज सेवा हि ईश्वर सेवा म्हणणारे कमीच आहेत..... हि संख्या वाढवावी लागेलच..... प्रत्येकाने सुट्टीतला १ तास जरी समाजाला द्यायचे ठरवले.... तरी सर्व समस्या सुटतील.... पैशाची व मार्गदर्शन करणारे लोकांची कमतरता नाही.... पण ग्राऊँड लेवलवर उतरुन काम करणाऱ्यांची कमतरता आहेच.... आज विचार प्रवर्तक लोकांची समाजाला आत्यंतिक गरज आहे.... माझी सर्व विचारवंतांना विनंती आहे..... कि तुमचा आठवड्याचा किमान १ तास तरी द्यावा.... हाच खऱ्या अर्थाने समाजसेवकांना त्रिवार सलाम असेल नाही का..... अशा असंख्य नीलिमा मिश्रा या भारतात आहेतच.... त्यामुळेच इतक्या भ्रष्टाचारामुळे सुध्दा देश लोकशाही प्रधान देश म्हणुन ओळख ठेऊन आहे..... 

   समाजसेवेसाठी काहिच कष्ट लागत नाहीत.... हे मत आहे समाज सेवा करणाऱ्यांचे आणि ते खरेही आहे..... पण.... पण.... ज्यांना समाजाशी काही देणे घेणे नाही.... त्याच्यासाठी समाजसेवा हे खुप अवघड काम आहे अगदी त्यांचे कामच नाही.... अशातले ते काम आहे.... आणि खेदाने असे म्हणावेसे वाटते..... त्यांनी त्यासाठी प्रयत्नही करु नये..... कारण त्यासाठी किंमत चुकवावी लागते..... आणि ती किंमक फक्त 26 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमीही असु शकते.... 

   बघा, सामाजिक सेवा आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रांत आहेत..... ज्याला राजकारण जमेल त्याला समाजकारण जमेलच असं नाही..... तसंच ज्याला समाजकारण जमेल.. त्याला राजकारण जमेल... असंही नाही.... त्यामुळे ज्याचे काम त्याने करावे हेच उत्तम..... लहानपणी चांगले संस्कार घडले... तर एक दिवस आपले राजकारणीही बदलू शकतील.... आणि देशाची चांगली सेवा करतील..... पण तसे चांगले संस्कार आजचे आई वडील करीत नाहीत.... असं खेदाने म्हणावसं वाटतं.... 

  भावी / तरुण पिढीवर उत्तम संस्कार हे आज तुमच्या हातात आहे.... तरुण पिढीवर अनैतिक मार्गाने पैसे कसे मिळवाल (हेच खरे धंदा कौशल्य असे शिकवून) असे संस्कार होऊ नयेत..... आज प्रत्येक भारतीयाने फुल ना फुलाची पाकळी प्रमाणे समाजकार्यास हातभार लावला.... तर नक्कीच आजची रोजगारा अभावी होणारी उपासमार टाळता येईल.... आणि पर्यायाने देशाला उन्नत करता येईल.... बघा, काट्या-कुटयात फुल उमलू शकत... तसच समाजकार्य करणाऱ्या लोकांबाबत म्हणावं लागेल..... आज भ्रष्टाचार माजत असताना, पैश्यासाठी माणूस क्रूर होत असताना असे लोक चांगला आदर्श निर्माण करतात... स्वःताचा आदर्श ठेवतात.... 

   चला, आपणही त्यांचा आदर्श ठेऊ.....आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे..... आपल्या पैकी बरेच वयाने तरुण आहेत आणि बरेच मनाने.... आपण सगळ्यांनीच आज हा संकल्प करुया...... भारताला बलशाली बनवूया.... स्वामी विवेकानंदानी आपल्याला दिलेल्या सुंदर, संपन्न आणि सुयोग्य भारताच्या स्वप्नाची स्वतःला आठवण करून द्या.... ते स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करुया.... सदाचार आणि प्रामाणीकपणाची एक अशी लाट येऊ दे.... जी संपूर्ण देशभर पसरेल..... 

   अत्यंत जागरुकपणे आणि तळमळीने आपण देशाला पुढे नेऊ या.... स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत बनवण्यासाठी आपण प्रयत्न करुया....

ॐ श्री गुरुदेव दत्त......

No comments:

Post a Comment