Saturday 20 October 2012

स्वप्न पाही आपुले मन.... पूर्ण कराया कष्टवावे तन.... 
                              जेणे सुखी सकल जन.... तेची सर्वोच्च ध्येय मान.... 

        मित्रांनो, अस म्हणतात.... स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत.... खरेही आहे ते.... पण स्वप्न पूर्ण करायचे म्हंटले तर.... एखाद्या स्वप्न पुर्ण झालेल्या स्वप्नवेड्याला विचारा.... त्याने स्वप्न पुर्ण करण्यासाठी काय किंमत चुकवली असेल ते.... बघा, तशी अनेक लोक आयुष्यात स्वप्न पाहतात... पण काहींचीच स्वप्न पुर्ण होतात.... यात त्यांचे नशिब वैगेरे काही नसते... फक्त त्यांनी घेतलेली मेहनत... कष्ट केलेले असते आणि त्याचेच त्याना फळ मिळते.... प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरूवात लहान स्वप्नापासुन होते.... आणि अशीच लोक त्याची स्वप्न पुर्ण करतात.... 

        जोपर्यंत माणूस कुठलं स्वप्नं पाहत नाही.... अन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक परिश्रम घेत नाही... तोपर्यंत यश मिळणं हि कठीण गोष्टच असते... कधी कधी शेकडो प्रयत्न करूनही यश मिळत नाही... म्हणून हिम्मत हरणारे लाखो आहेत.... पण जेव्हा दहा हजार वेळा प्रयत्न केल्यावर यशस्वी झालेल्या एडिसनची कहाणी त्यांना कळेल... तेहाच त्यांना यशासाठी किती संघर्ष करावा लागतो हे कळेल.... 

        बघा, या जगात तर भीक सुध्दा फुकट मिळत नाही.... ती सुध्दा कष्टाने मागावी लागते.... मग आपले स्वप्न देव कशाला फुकट पुर्ण करेल..... कष्टाला- मेहनतीला पर्याय कसा काय असु शकतो.... बघा, देव जरी पृथ्वीवर आला..... तर त्यालाही त्याच्या स्वप्नांसाठी लढावेच लागेल... मग आपली काय लायकी..... तेव्हा आपल्यालाही लढावे लागेल.... यशासाठी कष्ट मेहनतीला कोणताही पर्याय नाहीच.... 

       मित्रांनो, कोणत्याही यशासाठी मनामध्ये ध्येय गाठण्याच्या महत्त्वाकांक्षेची ज्योत पेटवावीच लागते... उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यासाठी उच्च विचारांची आणि भरपूर मेहनतीची कष्टाची गरज असतेच.... तसेच प्रत्येक वेळी आपल्या हाती यश येईलच असे नसते... पण अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा त्या चिकाटीने उभे राहून प्रयत्न करावेच लागतात..... अपयश ज्या गोष्टींमुळे आले त्या गोष्टी टाळाव्याच लागतात..... आणि सकारात्मक विचारांनी त्या दिशेकडे वाटचाल करावी लागते.... मग नक्कीच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता.... 

     मित्रांनो, जीवनात आलेले अपयश हे भरपूर गोष्टी शिकवून जाते.... आपली शिकण्याची समजण्याची तयारी मात्र हवी.... आणि सहजासहजी मिळालेल्या यशाची किंमत शून्य असते.... त्यामुळे चुकीच्या मार्गाने लवकरात लवकर यश मिळवण्याच्या भानगडीत न पडता.... स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने त्यामागे धावा.... थोडा वेळ लागेल.... आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी, पण त्याची किंमत तुम्हाला नाकीच माहिती असेल.... आणि मनाला ध्येयपूर्तीचे समाधान ही असेल.... 

      बघा, मित्रांनो आपले जीवन खुप सुंदर आहे..... एकदा आयुष्याशी झुंज देवुन पाहाच, ध्येय निश्चित करून योग्य मार्ग निवडून त्य मार्गी चाला. आपला ध्येय मार्ग आपल्या मेहनतीने, कष्टाने, कौशल्याने, कलागुणांनी प्रकाशमान करून उजळून टाका.... यशाची अमृत चव चाखा.... स्वःताचे नवे पर्व निर्माण करा....

 ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment