Thursday 21 November 2013

 
जीवनाची ओळख.....

आपला जन्म जीवन हेच मोठे महाभारतीय युद्ध आहे.... मग हे जाणूनच भगवंताने गीतेचे प्रयोजन केले... आपले मन हा अर्जुन आणि आपले गुरुतत्वांनुसार विचार-बुद्धी म्हणजे सारथीरूपी भगवंत... आपला देह हा रथ.... आपला आत्मा हा देहरथाचा स्वामी.... मग असे असता आपल्या आयुष्याच्या अनुभवांती महाभारत हा प्रत्येकाचा ग्रंथ तयार होतच जातो.... बघा, शेवटी प्रत्यक्ष भगवंत हाच अंतापर्यंतचा द्रष्टा, पण कलियुगाच्या परिस्थितीत अवतार घेणे दुरापास्तच.... किती अर्जुनांना उत्तरे देत बसणार हे जाणुनच त्याने द्वापार युगात गीता तयार केली व तिची ओळख ज्ञानदेव अवतारामार्फत तळापर्यंत करून दिली....

"आता गीता हाच अवतार समजायचा”.... गीता-ज्ञानेश्वरी-अभंग ज्ञानेश्वरी वाचताना.... आपण अज्ञानी आहोत ही जाणीव ज्या क्षणी होते, त्याक्षणी ते अज्ञान नाहीसे होऊन त्याच्या ऐवजी `आपण अज्ञानी आहोत' हे ज्ञान येते.... हेच ज्ञानबीज हळू हळू फोफावते.... आपल्या डोळ्यावरची अज्ञानपट्टी काढून आपणास डोळस करते....

 ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment