Saturday 23 November 2013




भारतरत्न पुरस्काराचे निकष..?..  
मित्रानोआज अशी वेळ आली आहे.... आपल्याला काही योग्य निर्णय घेता येत नसतील... तर काही काळ भारतरत्न पुरस्कार देणे बंद करा.... या देशात महागाईकुपोषणगरीबीअशा अनेक समस्या आहेत.... त्याकड़े कोणाचेही लक्ष्य नाही.... असल्या गोष्टीवर मात्र तावातावाने चर्चा चालतात....
मित्रानोसचिन व त्याचा खेळ हा काहीक्षणापुरता ठीक आहे.... क्रिकेट व क्रिकेटपटू यांना जास्त डोक्यावर घेतल्यामुळे आपण इतर खेळावर व खेळाडुवर अन्याय केल्यासारखे आहे.... सचिन हा चांगला माणुस म्हणून ठीक आहेच.... पण आपल्याकडे व्यक्ती स्तोम फार माजवले जाते.... बुद्धी गहाण टाकून लोकप्रियतेच्या मागे वाहत जाणे भारतीयांना आवडते.... भारतरत्न पुरस्कार फक्त भारतासाठी सर्वोच्च्य त्याग करणारे जसे सामाजिकसायण्टिस्ट वगैरेसाठीच असावा.... आणि त्याचे खरे निकष देखील हेच आहेत....
जेव्हा कधी देशावर भीषण संकट येतेत्या वेळी आपले सरकार क्रिकेटचा सहारा घेऊन आपले लक्ष क्रिकेटकडे आकर्षित करतेआपणाला याची जाणीव आहे..?.. आपला देश व ज़नतेची परिस्थिति फार वाईट आहे.... लवकरच सावध होऊन इतरांना सावध करा व क्रिकेट पाहण्याऐवजी माहितिपूर्ण चैनेल पहा.... सचिन आणि प्रा. सीएनआर राव यांच्यासारख्या संशोधकांस एकाच पंगतीत बसवून त्यांच्या मुखी भारतरत्न पुरस्काराचा घास भरवण्याचा प्रकार आपल्याकडेच होऊ शकतो..... जरी हे मान्य केले भारतरत्न कमाईवर नाही तर कर्तृत्वावर मिळतेमग भारताच्या प्रत्येक सैनिकाला भारतरत्न द्यावे लागेल....
माझ्यामतेसचिन उत्तम आहे की नाही हा चर्चेचा मुद्दा नाहीये..... आपल्याला सचिनपेक्षाही महान किंवा सचिन इतक्याच महान खेळाडूंचा विसर पडू नये.... असे अनेक खेळाडू भारतात होऊन गेले आणि आहेत.... मग भारतरत्नसाठी सचिनच्याच नावाचा अट्टाहास का..?..
नीट विचार केला पाहिजे.... एका सचिनसाठी ही नियमांची मोडतोड आहे का..!.. सध्या सरकार कठीण परिस्थितीतून जाते आहे.... एकूणच जनतेमधे रोष आहे..... त्यामुळे जनतेला खूष करण्यासाठी तर हा खटाटोप नव्हे ना असा विचार मनात येतो.....
याची दुसरी महत्वाची बाजू म्हणजे..... 'आजवर खेळाडू यामधे समाविष्ट का नव्हते'  याचाही विचार झाला पाहिजे..... बघा, 'भारतरत्नपुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो ज्या व्यक्तीचा देशाच्या उभारणीमध्ये प्रगतीमधे मोठा वाटा आहे..... भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. ....
आपल्या देशात खेळाच्या क्षेत्रात काम करणार्यान व्यक्तीला सर्वोच्च खेलरत्न दिला जातो.... भारतीय चित्रपटाच्या क्षेत्रात भरीव काम करणार्यार कलाकाराला 'दादासाहेब फाळके पुरस्कारदिला जातो.... पण आपल्या क्षेत्राचे कुंपण ओलांडून या लोकांचे देशासाठी नेमके योगदान काय असाही एक प्रश्न डोकावतो..... भारतरत्नच्या बाबतीत सचिनशाहरुखसलमान यांचे योगदान त्यांच्या क्षेत्रात सारखेच असेल, मग सचिनला दिले तर शाहरुखसलमान यांना का नको असाही एक प्रश्न पडतो.....
क्षणभर म्हणूया सचिन देवच आहेपण तो क्रिकेटपुरता..... त्याच्यापलिकडे काय...
ज्याप्रमाणे खेळाडुंना 'खेलरत्नआणि 'अर्जुन पुरस्कार' त्यांच्या सर्वोत्क्रुष्ट कामगिरीसाठी दिले जातातत्याचप्रमाणे भारतीय सैन्यातील जवानांना 'परमवीरचक्र',  'वीरचक्रआणि महावीरचक्रहे अवार्ड दिले जातात.... त्यामुळेच खेळ आणि लष्कर ही क्षेत्रे भारतरत्न पुरस्कारापासुन वेगळी ठेवली होती.... आपले जवान तर आपल्या देशासाठी म्हणजेच तुमच्यासाठी आपले प्राण कुर्बान करतात.... मग त्या जवानांना सुद्धा 'भारतरत्नदेण्यासाठी नियम बदलायला तुम्ही ओरड मारणार आहात का..?.. तस करण तुम्हाला व्यवहार्य वाटत नसेलतर तुमच्या एका लाडक्या सचिनसाठी भारतरत्नसारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराचे नियम सरकारला का बदलण्यास भाग पाडले..?..
'भारतरत्नहा अजुनही देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जात होता.... कारण तो उगाच कोणाला पण दिला जात नाही.... काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात, कि त्यांच्या नावापुढे पुरस्कार गौण ठरतो, तर काहींना ओळख टिकवण्यासाठी पुरस्कार लागतात..... पण स्वतः गरीब राहून समाजाला श्रीमंत करणारे 'महर्षिजेव्हा भारतरत्नच्या पंक्तीत जाऊन बसतात, तेव्हाच भारतीय मनाला खरा आनंद होतो असे वाटते....


ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment