Saturday 17 November 2012


अखेरचा हा तुला दंडवत.... 

आज एक प्रकारे महाराष्ट्राने दुसरा शिवाजी गमावला आहे..... असा शिवाजी जो वाघासारखा लढला म्हणून त्यांना वाघ म्हणतात..... आज असा शूर वाघ महाराष्ट्राने गमावला आहे फार वाईट वाटते....

पण आज असेही वाटते.... मा. बाळासाहेब गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत.... बाळासाहेब हे केवळ व्यक्ती नाहीत..... तो एक जग घडवणारा चिरंजीव विचार आहे.... ज्यातुन कित्येकजण घडले, कित्येक सावरले.... अन जोपर्यंत ह्या देशात शेवटचा मराठी असेल तो पर्यंत बाळासाहेब जिवंतच आहेत.... एवढ मात्र निश्चित आहे....

मित्रहो......

लिखाणाला धार ठेवा, आपल रक्त मराठी आहे, ते सळसळत ठेवा.... कोणी नजर उठवून बघितल न पाहिजे या मराठी भूमीला, तसेच कोणी विचार सुद्धा करू नये... आमच्यात फोड पाडण्याचा.... येणारा काळ खूप खडतर आहे, लक्षात ठेवा आपल्या प्रत्येकात बाळासाहेबांचे विचार आहेत.... प्रयत्न करा त्यांच्या तेजस्वी विचारांना जिवंत ठेवण्याचा ....

मा. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली.....

जय महाराष्ट्र.....

No comments:

Post a Comment