Thursday 1 November 2012

सार्थ साक्षरता भेटे.... ती विद्या मिळवू इथे.....

जर का एखाद्या विषयावर संवाद होत असेल तर तेथे अज्ञानी माणूस आपल्या ज्ञानाचा वापर वाद घालण्यासाठी करतो.... त्याच्या वाक्चातुर्याचा वापर... अहंकारयुक्त कृतीसाठी करतो.... आणि वाक् शक्तीचा प्रयोग.... दुसरयाचे मत चुकीचे.... आपलेच खरे करण्यासाठी करतो....ज्ञानी माणूस मात्र ह्या विरुद्ध आपले ज्ञानाचा, संपतीचा, आणि शक्तीचा वापर दुसऱ्याच्या भल्यासाठीच करतो.... तो ज्ञान देतो... दान करतो व दुर्बलास मदत करतो.... श्रीराम... 

आता खरे ज्ञानी होण्यासाठी मी पणा सोडणे महत्वाचे ठरते..... मीपणाचा त्याग म्हणजे अहं जीवपणाचा त्याग..... अहंपणा नाहीसा झाल्यावर अज्ञानही आपोआप नाहीसे होते.... मीपणा जर आपल्यापासून दूर गेला की.... प्रपंचच ब्रम्हरूप होतो..... महापुरात आपल्याला तारतात आपले सद्गुरू हा महापूर कोणता ? तर मायेचा आहे..... ' म ' म्हणजे आहे आणि ' या ' म्हणजे काहीं नाही..... श्रीराम..... 

जे काहीं नाही पण आहे.... असे वाटते ती माया.... या मायेच्या महापुरातून गुरु साधकाला तारून नेतात.... जे ' नाही ' त्याला आपण ' आहे ' समजतो..... आणि जे ' आहे ' त्याला आम्ही ' आहे ' मानायला तयार नसतो.... म्हणून सर्व ब्रम्ह घोटाळा झाला आहे.... या सर्वातून सुटायचे असेल तर आपल्या अंगी गुरुची तत्वे बाणली गेली पाहिजेत.... गुरुची शिकवण आपण पूर्णता अंगिकारली पाहिजेत.... श्रीराम.... 

आपल्याला विकास हा आतून बाहेर साधायचा आहे..... तुम्हास कोणीही शिकवू शकणार नाही…. कोणही तुम्हास अध्यात्मिक बनवू शकणार नाही..... तूमचा आत्मा हाच एकप्रकारे तुमचा गुरु आहे.... म्हणून स्वःताचे स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करा.... मात्र यासाठी मी पणा अहं सोडणे आवश्यक मगच आपल्याला स्वरूप जाणण्याची विद्या प्राप्त होईल.... श्रीराम.... 

                                        दाविते ज्ञानभानुते | अज्ञान तम नाशिते | 
                                                    आनंदी लीन जी होते | ती विद्या मिळवू इथे || 

आता इथे काय अभिप्रेत तर माणसाने अहंकारी असू नये.... बघा, लीन होणे म्हणजे वाकणे.... पण तेच फार अवघड जाते.... कारण जरा काही शिकलो, काम केले, अनुभव आला... माणसाचा अहंकार जागृत होतो व वाकणे विरून जाते..... मग यामुळे आपला आनंद हि हरवतो.... म्हणून स्वामी येथे शेवटी स्पष्ट करतात कि जी माणसे..... अहंकार कमी करून सोडून जीवनात आनंद घेत जो लीन अर्थात वाकतो.... येथे वाकणे म्हणजे स्वःताचा मी पणा सोडणे होय..... त्यासच विद्या प्राप्त होते.... कारण कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळवायचे.... ग्रहण करायचे असेल तर आपल्याला गुरूला शरण जाऊन गुरुपदी लीन होऊन, मला सर्व समजते हा अहं सोडूनच ते ज्ञान प्राप्त करता येते..... श्रीराम.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment