Thursday 24 May 2012

आपल्या गरजा आता कमी करण्याची वेळ आली आहे .....

आताची परिस्थिती पाहता महागाई अजून वाढेल असे दिसते.... महागाई तर वाढतच आहे.... ती वाढली पाहिजे.... असे काणीच म्हणणार नाही.... पण तरीही आपण महागाईच्या संदर्भात काही वेगळा विचार करू शकत नाही का ? बघा आज लोकांकडे पैसा असूनही त्यांना पैसा कमी पडतात .....

विचार करा.... एवढा पैसा असून आणि आपल्याकडे एवढी चैनीची साधने असूनही आपली मने असमाधानी का...? उपभोगाची साधने अजून मिळतच रहावीत असे सतत का वाटते...? आपण सुखी आहोत असे आपल्याला का वाटत नाही... ? मग आता यावर उपाय काय ....

यावर एकच निष्कर्ष आहे.... की नवनव्या वस्तूंचा उपयोग करण्यात आणि उपभोग घेण्यात सुख नाही..... एखादी वस्तू वापरायला मिळावी असे वाटते..... ती मिळेपर्यंत तिचे महत्त्व फार वाटते.... पण एकदा ती हातात पडली की तिचे काही वाटेनासे होते.... मग नव्या वस्तूचे आकर्षण वाटायला लागते...

आता महत्वाचे म्हणजे... आपल्या गरजा आता कमी करण्याची वेळ आली आहे .....सतत उपभोग वाढवण्यात सुख नाही..... तर मर्यादित उपभोग आणि प्रदीर्घ चितन यात सुख आहे..... गरजा सतत वाढवत नेल्या की त्या वाढतच जातात..... त्यांना काही अंतच रहात नाही..... म्हणून आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत..... माणसाच्या गरजा जेवढ्या कमी असतील.... तेवढे तो अधिक सुखी होतो..... सतत महागाई वाढत गेली की माणूस त्रस्त होतो... पण माणसाने आपल्या गरजा कमी केल्या असतील.... तर तो वाढत्या किमतींनी त्रस्त आणि दुःखी होत नाही.....

गांधीजीनी तर मर्यादित गरजा हेच आपल्या सुखाचे रहस्य असल्याचे म्हटले होते.... काही लोक काहीही महाग झाले की लगेच आरडा ओरडा करायला लागतात.... आपल्या लहानपणी कशी स्वस्ताई होती हे सांगायला लागतात.... पण त्यांच्या लहानपणी सर्वांच्याच गरजा किती कमी होत्या... हे काही ते सांगत नाहीत....

आपल्या घरातल्या एकेक वस्तूवर नजर टाकली तरी आपल्याला हे सहजच लक्षात येते की आपल्या घरातल्या अगदी सवयीच्या झालेल्या किती तरी वस्तू आपल्या लहानपणी आपल्या वापरातही नव्हत्या..... आपण किती तरी अनावश्यक वस्तू आणि सेवा खरेदी करून ठेवलेल्या असतात.... आताचे जीवन आधुनिक आणि गतिमान झाले आहे... म्हणून यातल्या काही गोष्टी आपल्यासाठी आवश्यक झाल्या आहेत... पण यातली प्रत्येक गोष्ट आवश्यकच आहे का.... उपयोग गरजेचा आहे का.... याचा आपण विचार केला पाहिजे....

यातल्या काही गोष्टी नक्कीच अनावश्यक आहेत.... पण आपण त्यांचे गुलाम झालेलो असतो... त्यामुळे त्यांच्या शिवाय राहू शकत नाही.... आणि वीजदर कितीही वाढले... तरी आपल्या वीज वापरात काही काटकसर करण्याचा आपण विचार सुद्धा करीत नाही..... तसा विचार आपण केला पाहिजे.... आपल्या घरात किती वीज विनाकारण जळत असते.... याचा आपण आढावा घ्यावाच....

महागाईचे आपल्याला खरेच चटके बसत असतील.... तर अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही.... अशी प्रतिज्ञा करा.... आपण हॉटेलात किती वेळा जातो याचा आढावा घ्या... हॉटेलात जाणे किती गरजेचे आहे ते बघा.... इकडे महागाईच्या नावाने आरडा ओरडा आणि तिकडे हॉटेलांत जेवायला येणारांची गर्दी हे दृष्य विसंगत वाटते... हॉटेलात केवळ गर्दीच होते असे नाही.... तर तिथेही ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात..... हे काय महागाईने त्रस्त झाल्याचे लक्षण आहे का.... जरा विचार करा... ?

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

No comments:

Post a Comment